AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य कुठून उगवला… थेट पाकिस्तानने केले भारताचे तोंड भरून काैतुक, म्हटले कधीही…

इराण आणि अमेरिका युद्धाने मोठी खळबळ उडाली. स्थिती गंभीर होताना दिसली. या युद्धाचा फटका सर्वांनाच बसला. पाकिस्तान पहिल्या दिवसापासूनच युद्धात लुडबुड करताना दिसला. अमेरिका आणि इराणच्या युद्धानंतर मोठा धसका पाकिस्तानने घेतला आहे.

सूर्य कुठून उगवला... थेट पाकिस्तानने केले भारताचे तोंड भरून काैतुक, म्हटले कधीही...
Pakistani Ambassador Faisal Niaz Tirmizi
| Updated on: Apr 15, 2026 | 10:32 AM
Share

सध्याच्या घडीला कोण्याही देशाला युद्ध परवडणार नाही, असे सातत्याने काही वर्षांपासून सांगितले जात होते. त्याचे उत्तम उदाहरण इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धात बघायला मिळाले. इराण आणि अमेरिका युद्धात मोठा फटका बसला. धक्कादायक म्हणजे या युद्धाचा परिणाम फक्त तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही तर अख्ख्या जगाला युद्धाच्या झळा बसताना दिसल्या. यासोबतच पुढे वीस वर्ष भरून न निघणारे नुकसानही झाले. या युद्धामुळे पाकिस्तानलाही समजले की, युद्धात कोण्या एका देशाची वाट लागत नाही तर सर्वांनाच त्याच्या झळा सहन कराव्या लागतात. पाकिस्तानी राजदूतने दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्यातील परमाणु सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत जोरदार काैतुक केले. त्यांनी दावा केला की, दोन्ही देश परमाणू सुविधांवर एकमेकांच्या कधीच हल्ला करणार नाहीत, त्याची गारंटी आहे.

पाकिस्तानी राजदूत फैसल नियाज तिरमिजी यांनी आरटीवीआय डॉट कॉमला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याकडून भारताचे काैतुक करण्यात आले. फैसल नियाज यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात गारंटीचा एक खूप जास्त चांगला इतिहास आहे. दोघेही कधीच एकमेकांच्या परमाणू सुविधांवर हल्ला करणार नाहीत, मध्य पूर्वेतील संघर्षावर बोलताना त्यांनी म्हटले की, जी स्थिती आहे ती खूप जास्त वाईट आहे. इस्त्रायलने केलेला बुशहरवरील हल्ला धक्कादायक होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी रशिया मध्यस्थी करणार का? यावर बोलताना त्यांनी म्हटले की, रशियाची कायमच यात महत्वाची भूमिका राहिली आहे. कारण रशिया आणि भारताचे खूप जास्त चांगले संबंध राहिले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी रशिया निष्पक्ष भूमिका निभावू शकतो. पहिल्यांदाच पाकिस्तान भारताबद्दल जाहीरपणे चांगली भूमिका घेताना दिसला.

युद्ध सोपे राहिले नसल्याचे आता पाकिस्तानच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. पाकिस्तान इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धात मध्यस्थी करताना दिसत आहे. मात्र, इस्लामाबादमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत त्यांना फार काही यश मिळाले नाही. अमेरिकेच्या मदतीकरिता या युद्धात एकही देश पुढे येत नसताना शेवटी पाकिस्तानला अमेरिकेने हाताशी धरल्याचे दिसत आहे.

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.