AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेचा पाकिस्तानसोबतचा नौदल सराव रद्द, भारताच्या आक्षेपानंतर कोलंबोचा निर्णय

भारताच्या आक्षेपानंतर श्रीलंकेने पाकिस्तानसोबतचा संयुक्त नौदल सराव रद्द केला आहे. भारत ऊर्जा केंद्र विकसित करत असलेल्या त्रिंकोमालीजवळ हा सराव होणार होता. या पार्श्वभूमीवर कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तालयाने श्रीलंकेला भारताची चिंता कळवली.

श्रीलंकेचा पाकिस्तानसोबतचा नौदल सराव रद्द, भारताच्या आक्षेपानंतर कोलंबोचा निर्णय
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Apr 19, 2025 | 3:09 PM
Share

भारताच्या आक्षेपानंतर श्रीलंकेचा पाकिस्तानसोबतचा नौदल सराव रद्द करण्यात आला आहे. श्रीलंकेतील त्रिंकोमाली बंदराजवळ हा सराव करण्याच्या पाकिस्तानच्या प्रस्तावाकडे भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात होते. श्रीलंकेने परदेशी संशोधन जहाजांच्या आगमनावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. पाकिस्तानी नौदल या सरावासाठी त्रिंकोमाली येथे आल्याची माहिती मिळताच भारताने कोलंबोतील उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून श्रीलंका सरकारशी बोलून ते थांबविण्यास सांगितले.

या सरावातून माघार घेतल्यामुळे श्रीलंकेला पाकिस्तानच्या विरोधालाही सामोरे जावे लागले. मात्र, पाकिस्तानच्या तीव्र विरोधानंतरही श्रीलंकेने हा सराव रद्द केला. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.

भारताने व्यक्त केलेल्या चिंतेनंतर श्रीलंकेने पाकिस्तानसोबतचा नौदल सराव रद्द केला आहे. श्रीलंकेतील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या त्रिंकोमाली बंदराजवळ हा संयुक्त सराव होणार होता. त्रिंकोमाली हे बंदर शहर आहे, जिथे भारताच्या मदतीने ऊर्जा केंद्र बांधले जात आहे. अशा तऱ्हेने पाकिस्तानच्या नौदलाच्या या बंदराजवळ च्या सरावावर भारताचा आक्षेप होता. भारताने आपला आक्षेप श्रीलंकेसमोर ठेवला. पाकिस्तानचा विरोध असूनही श्रीलंकेने हा सराव रद्द करण्याचा निर्णय घेतला.

एचटीने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी हा सराव होणार होता. या भेटीदरम्यान भारत आणि श्रीलंकेने संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारत, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीने त्रिंकोमाली येथे पाईपलाईनसह वीज केंद्र उभारण्याचा करार केला आहे.

श्रीलंकेतील त्रिंकोमाली बंदराजवळ हा सराव करण्याच्या पाकिस्तानच्या प्रस्तावाकडे भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात होते. श्रीलंकेने परदेशी संशोधन जहाजांच्या आगमनावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. चीनच्या पाळत ठेवणाऱ्या जहाजांच्या कारवायांमुळे ही बंदी घालण्यात आली होती. आशियाखंडात चीन आणि पाकिस्तान ची युती जुनी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नौदल या सरावासाठी त्रिंकोमाली येथे आल्याची माहिती मिळताच भारताने कोलंबोतील उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून श्रीलंका सरकारशी बोलून ते थांबविण्यास सांगितले. या सरावातून माघार घेतल्यामुळे श्रीलंकेला पाकिस्तानच्या विरोधालाही सामोरे जावे लागले. मात्र, पाकिस्तानच्या तीव्र विरोधानंतरही श्रीलंकेने हा सराव रद्द केला.

भारतीय अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सरावाच्या तारखाही माहित नव्हत्या. पाकिस्तानची पीएनएस अस्लत ही युद्धनौका फेब्रुवारी आणि मार्चमहिन्यात कोलंबो बंदरात आल्याची माहिती समोर आली आहे. पीएनएस अस्लत ने कोलंबोजवळ श्रीलंकेच्या युद्धनौकेसोबत संवाद आणि डावपेचांच्या आधारे पासेक्स सराव केला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.