AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क पाकिस्तान भारताच्या मदतीला धावला, भर समुद्रात बंद पडलेल्या जहाजाला मोठी मदत

Pakistan Help India : अरबी समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या एका भारतीय जहाजाच्या चालक दलाला पाकिस्तान नौदलाने मदत केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चक्क पाकिस्तान भारताच्या मदतीला धावला, भर समुद्रात बंद पडलेल्या जहाजाला मोठी मदत
pakistan help Indian shipImage Credit source: Google
| Updated on: May 05, 2026 | 10:45 PM
Share

गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशांमधील संबंध तितकेसे चांगले नाहीयेत. त्यामुळे भारताला वारंवार जखमा देणारा पाकिस्तान कधी आपल्या मदतीला येईल, यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. मात्र अशी एक घटना घडली आहे, जिथे पाकिस्तानने आपल्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा वेगळा मानवीय दृष्टिकोन दाखवला. अरबी समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या एका भारतीय जहाजाच्या चालक दलाला पाकिस्तान नौदलाने मदत केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतीय जहाज समुद्रात अडकले

समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय ऑफशोर टग आणि सप्लाय वेसल एमव्ही गौतम ओमानहून भारताकडे येत होता. हे जहाज समुद्रात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि जहाज थांबले. या जहाजावर सहा भारतीय आणि एक इंडोनेशियन नागरिक असे चालक दल होते. या दलाने मुंबईतील मॅरिटाइम रेस्क्यू अँड कोऑर्डिनेशन सेंटरला एसओएस संदेश पाठवला. मुंबई केंद्राने तात्काळ पाकिस्तान अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.

पाकिस्तानी नौदलाची मदत

भारताकडून मदतीची विनंती आल्यानंतर पाकिस्तानी नौदल आणि पाकिस्तान मॅरिटाइम सिक्युरिटी एजन्सी (PMSA) यांनी लगेच कारवाई केली. दोन्ही संस्थांनी चालक दलाला अन्न, वैद्यकीय मदत आणि तांत्रिक सहाय्य पुरवले. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने, चालक दलाला सर्वतोपरी मदत दिली जात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे, आता जहाज सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकारात्मक पाऊल

महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान नौदलाने अरबी समुद्रात अडकलेल्या एका व्यापारी जहाजावरील 18 चालक सदस्यांना वाचवले होते. या दोन्ही घटनांमुळे पाकिस्तान नौदलाच्या मानवीय भूमिकेचे कौतुक केले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चालक दलाची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या आपत्कालीन सहकार्याला सकारात्मक पाऊल मानले जात आहे. विशेषतः दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि लष्करी तणाव असताना, समुद्रात अडकलेल्या भारतीय नाविकांना मदत करणे हा एक महत्त्वाचा मानवी संदेश ठरला आहे.

एमवी गौतमवरील चालक दलाच्या सदस्यांनी मदत मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला. एका भारतीय नाविकाने सांगितले की, ‘समुद्रात एकटे अडकणे खूप भीतीदायक असते, पण मुंबईहून संदेश गेल्यानंतर काही तासांतच पाकिस्तान नौदलाची मदत पोहोचली. त्यांनी अन्न, पाणी आणि आवश्यक औषधे दिली, आता पाकिस्तानच्या या मदतीचे कौतुक होत आहे.

Follow Us
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?