AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा विष ओकलं, भारतावर भडकून म्हणाला ती मोठी चुक झाली!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. हीच बाब आता पाकिस्तानला खटकली आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा विष ओकलं, भारतावर भडकून म्हणाला ती मोठी चुक झाली!
narendra modi and shehbaz sharif
| Updated on: Oct 09, 2025 | 9:19 PM
Share

Pakistan Critrizes Afghanistn : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. दोन्ही देशांतील व्यापार, प्रवास सध्या बंद आहे. युद्धात अनेकवेळा पराभव स्वीकारावा लागलेला असला तरी पाकिस्तानच्या कुरापती चालूच असतात. भारतासोबत मैत्री असलेल्या प्रत्येक देशावर पाकिस्तान टीका करत असतो. सध्या अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अधिकृतपणे भारताच्या दौऱ्यावर आहेत. असे असतानाच आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अत्यंत मोठे विधान लागले आहे. त्यांनी फगाणिस्तावर सडकून टीका केली आहे.

अफगाणी नागरिकांना आश्रय देऊन चूक केली

ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अफगाणीस्तानवर भाष्य केले. या मुलाखतीत अफगाणिस्तान हा देश नेहमीच भारताशी प्रामाणिक राहिलेला आहे, असे विधान केले. तसेच आपण अफगाणी नागरिकांना आश्रय देऊन मोठी चुक केली, असेही विधान त्यांनी केले आहे. अफगाण नागरिकांना आश्रय देण्याचा निर्णय हा अमेरिकेच्या दबावाखाली गेण्यात आला होता. आपण लाखो अफगाणिस्तानी नागरिकांना आश्रय दिला, पण त्यांनी कधीच पाकिस्तानच्या हिताचा विचार केला नाही. आजदेखील अफगाणिस्तान भारताच्याच बाजूने उभा राहतो, अशी आगपाखड आसिफ यांनी केली.

नेमके का विधान केले?

अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुक्तारी सध्या अधिकतपणे भारताच्या दौऱ्यावर आहेत. ते 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत भारतात असतील. आमीर खान यांचा हा दौरा भारत-अफगाणिस्तान यांच्यातील संवाद आणि राजनैतिक संबंधांसाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे. एकीकडे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधात सुधारणा होत असतानाच ख्वाजा आसीफ यांनी अफगाणिस्तानविरोधात विधानं केली आहेत. आता ख्वाजा यांच्या या विधानांमुंळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानात राहतात 29 लाख अफगाणी नागरिक

एका रिपोर्टनुसार पाकिस्तानातील विविध राज्यांत एकूण 29 लाख अफगाणी नागरिक राहतात. यातील साधारण 13 लाख नागरिक नोंदणीकृत आहेत. पाकिस्तानात अफगाणी नागरिकांची स्थिती फारच दयनीय मानली जाते. असे असताना आताी ख्वाजा यांनी केलेल्या विधानामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक