AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा विष ओकलं, भारतावर भडकून म्हणाला ती मोठी चुक झाली!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. हीच बाब आता पाकिस्तानला खटकली आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा विष ओकलं, भारतावर भडकून म्हणाला ती मोठी चुक झाली!
narendra modi and shehbaz sharif
| Updated on: Oct 09, 2025 | 9:19 PM
Share

Pakistan Critrizes Afghanistn : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. दोन्ही देशांतील व्यापार, प्रवास सध्या बंद आहे. युद्धात अनेकवेळा पराभव स्वीकारावा लागलेला असला तरी पाकिस्तानच्या कुरापती चालूच असतात. भारतासोबत मैत्री असलेल्या प्रत्येक देशावर पाकिस्तान टीका करत असतो. सध्या अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अधिकृतपणे भारताच्या दौऱ्यावर आहेत. असे असतानाच आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अत्यंत मोठे विधान लागले आहे. त्यांनी फगाणिस्तावर सडकून टीका केली आहे.

अफगाणी नागरिकांना आश्रय देऊन चूक केली

ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अफगाणीस्तानवर भाष्य केले. या मुलाखतीत अफगाणिस्तान हा देश नेहमीच भारताशी प्रामाणिक राहिलेला आहे, असे विधान केले. तसेच आपण अफगाणी नागरिकांना आश्रय देऊन मोठी चुक केली, असेही विधान त्यांनी केले आहे. अफगाण नागरिकांना आश्रय देण्याचा निर्णय हा अमेरिकेच्या दबावाखाली गेण्यात आला होता. आपण लाखो अफगाणिस्तानी नागरिकांना आश्रय दिला, पण त्यांनी कधीच पाकिस्तानच्या हिताचा विचार केला नाही. आजदेखील अफगाणिस्तान भारताच्याच बाजूने उभा राहतो, अशी आगपाखड आसिफ यांनी केली.

नेमके का विधान केले?

अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुक्तारी सध्या अधिकतपणे भारताच्या दौऱ्यावर आहेत. ते 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत भारतात असतील. आमीर खान यांचा हा दौरा भारत-अफगाणिस्तान यांच्यातील संवाद आणि राजनैतिक संबंधांसाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे. एकीकडे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधात सुधारणा होत असतानाच ख्वाजा आसीफ यांनी अफगाणिस्तानविरोधात विधानं केली आहेत. आता ख्वाजा यांच्या या विधानांमुंळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानात राहतात 29 लाख अफगाणी नागरिक

एका रिपोर्टनुसार पाकिस्तानातील विविध राज्यांत एकूण 29 लाख अफगाणी नागरिक राहतात. यातील साधारण 13 लाख नागरिक नोंदणीकृत आहेत. पाकिस्तानात अफगाणी नागरिकांची स्थिती फारच दयनीय मानली जाते. असे असताना आताी ख्वाजा यांनी केलेल्या विधानामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...