AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन् लोक अचानक होतात गायब, नव्या संकटाने पाकिस्तानमध्ये गोंधळ, नेमकं काय घडतंय?

पाकिस्तानमध्ये आता नव्या संकटाने तोंड काढले आहे. तिथे बलुचिस्तानमध्ये अचानक लोक गायब होत आहेत. ही समस्या निर्माण झाल्याने तिथल्या लोकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय. त्यामुळे यावर आता काय तोडगा निघणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

...अन् लोक अचानक होतात गायब, नव्या संकटाने पाकिस्तानमध्ये गोंधळ, नेमकं काय घडतंय?
Pakistan
| Updated on: Sep 21, 2025 | 11:40 PM
Share

Pakistan News : पाकिस्तान हा असा देश आहे जिथे कधी काय होईल हे सांगता येत नाही. महागाईच्या संकटामुळे इथे अगोदरच लोकांपुढे अनेक संकटं निर्माण झालेली आहेत. दुसरीकडे शिक्षण, आरोग्याच्याही गंभीर समस्या आहेत. असे असतानाच आता या देशात नव्या संकटाने तोंड वर काढलं आहे. इथे बलुचिस्तान या प्रदेशात लोक गायब होत आहेत. या संकटामुळे आता पाकिस्तानची जगभरात नाचक्की होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या संकटावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यापुढे निर्माण झाले आहे.

नेमके प्रकरण काय? बलुचिस्तानमध्ये काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमध्ये सध्या बेपत्ता होणाऱ्या लोकांचा मुद्दा गंभीर बनला आहे. बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमधील वरिष्ठ राजकीय नेते जमीअत उलेमा ए इस्लामचे प्रमुख मौलाना फजल उर रहमान यांनीदेखील सार्वजनिकरित्या बलुचिस्तानमधील संरक्षक दलं लोकांना अवैध पद्धतीने गायब करत असल्याचे मान्य केले आहे. खैबर पख्तुनख्वाच्या एका सभेत त्यांनी बलुचिस्तानमधील युवक आणि कार्यकर्त्यांना बेकायदेशीररित्या गायब केले जात आहे. त्यांची कुटुंबे अजूनही न्यायाच्या शोधात आहेत. ही कुटुंबे आंदोलन करत आहेत, असे भाष्य केले आहे.

बलुचिस्तानमध्ये हजारो कुटुंबीय बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेत. आमच्या कुटंबातील बेपत्ता झालेल्या सदस्यांचं काय झालं? ते कुठे आहेत? असे प्रश्न या कुटुंबीयांकडून उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावर आंतरराष्ट्री मानवाधिकार संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. मात्र अद्याप यावर कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

मानवाधिकार संघटनांचे मत काय?

बलुचिस्तानमधील या समस्येवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेरिकेतील मानवाधिकारांसाठी लढणारे वकील रीड ब्रॉडी यांनी जिनेव्हा प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या 7 व्या बलुचिस्तान आंतरराष्ट्रीय संम्मेलनात हा मुद्दा उपस्थित केला. बलुचिस्तानच्या व्यथेकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्या भागात होत असलेल्या अवैध हत्या, बेपत्ता होणारे लोक, महिला कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या या प्रकरणांची स्वतंत्र आणि निष्पक्ष तपासणी व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता बलुचिस्तानमधील या गंभीर मुद्द्याची पाकिस्तान सरकार दखल घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?