AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात हाहाकार, डाळ मिळत नाही म्हणून…गंभीर संकट आल्याने शाहबाज यांची झोप उडाली!

पाकिस्तान हा देश नेहमीच कशाच्यातरी संकटात सापडतो. आता या देशापुढे नवे आणि गंभीर संकट निर्माण झाले आहे. येथील नागरिक डाळीसाठी तरसत आहेत.

पाकिस्तानात हाहाकार, डाळ मिळत नाही म्हणून...गंभीर संकट आल्याने शाहबाज यांची झोप उडाली!
pakistan pulsesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 6:24 PM
Share

Pakistan Pulses Crisis : पाकिस्तान हा असा देश आहे जो नेमहीच आर्थिक विवंचनेतून जातो. या देशाला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या देशांकडून कर्ज घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून तर हा देश नेहमीच पैसे मागतो. या देशात कधी गव्हाचे दुर्भिक्ष्य पाहायला मिळते. तर कधी पाण्याची टंचाई झालेली पाहायला मिळते. असे असतानाच आता या देशावर एक मोठे संकट आले आहे. या देशात डाळीचं मोठं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे.

1998 सालानंतर डाळीचे अत्पादन घटत गेले

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात दिवसेंदिवस डाळींच्या उत्पादनात घट होत आहे. बहुसंख्य डाळ परदेशातून आयात केली जाते. आकड्यांत सांगायचे झाल्यास पाकिस्तान प्रत्येक वर्षी साधारण 98 कोटी डॉलरची डाळ आयात करतो. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या रिपोर्टनुसार कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी पाकिस्तानातील या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आगामी काळात पाकिस्तानात डाळींचे उत्पादन न वाढल्यास मोठे संकट उभे राहू शकते. पंजाब पल्सेस इम्पर्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष आणि ग्रेन मार्केटचे चेअरमन राणा मुहम्मद तैयब यांनी सांगितल्यानुसार 1998 सालाच्या अगोदर पाकिस्तान जगातील प्रमुख डाळ निर्यात करणारा देश होता. नंतरच्या काळात परवेज मुशर्रफ यांच्या सरकारने डाळीवरील निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर डाळीच्या उत्पादनामुळे तोटा होऊ ळागला. परिणामी हळूहळू डाळींच्या उत्पादनात घट झाली.

10.7 लाख टन डाळ करावी लागते आयात

पाकिस्तानात दरवर्षी 16.2 लाख टन डाळ लागते. यातील साधारण 10.7 लाख टन डाळ आयात केली जाते. म्हणजेच पाकिस्तानला साधारण 80 टक्के डाळ आयात करावी लागते. पाकिस्तानातील AARI चे पल्सेज सेक्सनचे मुख्य सहाय्यक खालीद हुसैन यांच्या मतानुसार डाळ ही मानवी पोषणासाठी तसेच मातीची पौष्टीकता कायम राहावी यासाठी फार गरजेची आहे. परंतु मर्यादीत नफा आणि निर्यातीवर बंदी असल्याने शेतकरी डाळीचे उत्पादनच घेत नाहीयेत. त्यामुळे आता परिस्थिती कठीण झाली आहे. दरम्यान, आता पाकिस्तान या संकटातून कसा मार्ग काढणार, भविष्यात पाकिस्तान डाळ निर्यातीवरील बंदी हटवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.