AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जवाहरलाल नेहरुंचं नाव घेत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी राजकारण्यांचे कान टोचले!

Singapore Prime Minister Lee Hsien Loong : ज्या प्रमाणे भारतात नेहरुंनी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला, तसाच संघर्ष आपल्या देशातही झाला, असं ते म्हणालेत.

Video | जवाहरलाल नेहरुंचं नाव घेत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी राजकारण्यांचे कान टोचले!
सिंगापूरचे पंतप्रधान संसदेत बोलताना..
| Updated on: Feb 17, 2022 | 5:27 PM
Share

सिंगापूर : जवाहरलाल नेहरु यांच्या नावाचा उल्लेख करत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी (Singapore Prime Minister Lee Hsien Loong) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आपल्या वक्तव्यात जवाहरलाल नेहरुंच्या नावाचा उल्लेख करत राजकारण्यांचे कान सिंगापूरचे पंतप्रधान ली शिंग लूंग यांनी टोचले आहेत. आपआपल्या राष्ट्रातली लोकशाही (Democracy) कशी अबाधित राहिल, यासाठी कसं काम करायला हवं, यावर सिंगापूरचे पंतप्रधान तिथल्या संससदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नेहरुंच्या देशात (Jawaharlal Nehru) जसं संसदेत बलात्कार आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे असलेली लोकं दिसून येत आहेत, तसं आपल्याकडे व्हायला नको, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलंय. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी विशेषाधिकार समितीच्या अहवालावर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यावेळी त्यांनी जवाहरलाल नेहरु यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली. जवाहरलाल नेहरु  यांची भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एक महत्त्वाची भूमिका बजवाली. भारताची लोकशाही उभी करण्यात त्याचं योगदानही मोठं आहे, असं त्यांनी म्हटलंय. मात्र ज्या मूल्यांवर लोकशाही कायम राहायला हवी, ती मूल्य जपण्याची गरज आहे, असंही ते म्हणालेत. पण दुर्दैवीनं काळाच्या ओघात ही मूल्य विसरुन जात ज्यांनी लोकशाही राष्ट्रासाठी लढा दिला, एक नेतृत्त्व म्हणून जी माणसं उदयाला आली, त्यांचे विचार आणि त्यांची मूल्य ही मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सिंगापूरच्या पंतप्रधानांचं महत्त्वाचं विधान

संसदेत बोलताना सिंगापूरच्या पंतप्रधानांनी म्हटलंय, की…

नेहरुंनी उभ्या केलेल्या भारत देशातील संसदेबाबत मीडिया रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारतातील लोकसभेतल्या अर्ध्याहून अधिक खासदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्यात बलात्कार आणि हत्येसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. असंही म्हटलं जातं की, त्यातील बहुतेक गुन्हे राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आले आहेत. सिंगापूरला या मार्गापासून दूर न्यायचं असेल तर काय करावं लागेल?

ज्या प्रमाणे भारतात नेहरुंनी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला, तसाच संघर्ष आपल्या देशातही झाला. आपल्या देशातच एक मजबूत आणि ताकदवर लोकशाही मूल्यांची पेरणी करण्यात आली. या मूल्यांना जपण्याचं काम येणाऱ्या पिढ्यांनी करणं, ही आपली जबाबदारी आहे.

अप्रत्यक्षपणे त्यांनी लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्यांवर निशाणा साधलाय. फक्त भारतातीलच नव्हे तर अमेरिकेतल्या निवडणुका जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख करत त्यांनी आपली लोकशाहीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 44 मिनिटं 30 सेकंद केलेल्या आपल्या भाषणात ली शिंग लूंग यांनी सहाव्या मिनिटापासून लोकशाही, जवाहरलाल नेहरु आणि लोकशाही मूल्यांवर वक्तव्य केली आहेत. यावेळी त्यांनी लोकशाहीला फाटा देणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी केलेलं संसदेतलं भाषण आता भारतातही चांगलंच चर्चेत आलंय.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

Delhi high court : ही खुर्ची ‘सर’साठी आहे? Justice Rekha Palli यांनी वकिलाला दिला सल्ला; वाचा रंचक वृत्त

हिमालयातल्या अज्ञात साधूच्या इशाऱ्यावर कोट्यवधींचा शेअर बाजार? माजी सीईओ चित्रा रामकृष्णांवर छापे, म्हणतात, ती एक अदृश्य शक्ती!

‘भारत छोडो आंदोलना’ची ठिणगी पडली आणि इंग्रजांना पळता भुई थोडी झाली

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.