AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेत भारताला मोठा झटका; चीनसाठी आनंदाची खबर

चीनला शह देण्याच्या कूटनीतीचा भाग म्हणून भारताकडून शेजारी देशांना मदत केली जाते. | India China

श्रीलंकेत भारताला मोठा झटका; चीनसाठी आनंदाची खबर
कोलंबो येथील बंदर परिसरात कंटेनर टर्मिनल उभारण्यासाठी श्रीलंकेने काही दिवसांपूर्वी भारत आणि जपानशी करार केला होता. मात्र, आता या करारातून श्रीलंकेने अचानक माघार घेतली आहे.
| Updated on: Feb 03, 2021 | 8:00 PM
Share

नवी दिल्ली: लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेजारी देशांची मोट बांधण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. चीनला शह देण्याच्या कूटनीतीचा भाग म्हणून भारताकडून शेजारी देशांना मदत केली जाते. मात्र, श्रीलंकेच्या निर्णयामुळे भारताच्या अशाच एका रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. (Sri Lanka pulls out of japan India port agreement)

कोलंबो येथील बंदर परिसरात कंटेनर टर्मिनल उभारण्यासाठी श्रीलंकेने काही दिवसांपूर्वी भारत आणि जपानशी करार केला होता. मात्र, आता या करारातून श्रीलंकेने अचानक माघार घेतली आहे. समुद्री क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठी हा प्रकल्प भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता.

चीनकडून 50 कोटी डॉलर्स खर्च करून उभारण्यात आलेल्या वादग्रस्त टर्मिनलशेजारीच या प्रकल्पाची उभारणी होणार होती. या प्रकल्पात भारत आणि जपानची 49 टक्के भागीदारी होती. मात्र, आता श्रीलंकेने आपल्याच बळावर या टर्मिनलची उभारणी करण्याचा मानस जाहीर केला आहे. या टर्मिनलची मालकी श्रीलंका पोर्टस ऑथोरिटीकडे राहील. या प्रकल्पासाठी जवळपास 80 कोटी डॉलर्स इतका खर्च येणार आहे.

मोदी सरकारने 2019 मध्ये केला होता करार

या टर्मिनलच्या उभारणीसाठी मोदी सरकारने 2019 मध्ये श्रीलंकेशी करार केला होता. मात्र, त्यानंतर सत्तांतर झाले आणि गोतबया राजपक्षे यांचे सरकार आले. हे सरकार टिकवण्यासाठी गोतबया यांना कट्टर राष्ट्रवादी विचारसरणीच्या काही पक्षांची साथ घ्यावी लागली. हे पक्ष राष्ट्रीय संपत्ती परदेशी लोकांच्या हातात देण्यास तयार नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प भारताच्या हातून गेला आहे.

हिंदी महासागरातील हंबनटोटा परिसरात चीनचे वाढते प्राबल्य भारत आणि अमेरिकेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. 2014 साली काही चिनी पाणबुड्या कोलंबो बंदराच्या परिसरात आल्या होत्या. तेव्हा भारताने चीनच्या दादागिरीला विरोध केला होता. तेव्हापासून श्रीलंकेने चिनी पाणबुड्यांना आपल्या सागरी क्षेत्रात येण्यास मज्जाव केला आहे.

संबंधित बातम्या:

कुडकुडणाऱ्या थंडीत आमचे जवान तैनात, त्यांना सरकार पैसेही देत नाही, ही कोणती देशभक्ती? : राहुल गांधी

गोळ्या झाडल्या जाव्यात, प्रेतांचे खच पडावेत हीच राहुल गांधींची इच्छा: संबित पात्रा

(Sri Lanka pulls out of japan India port agreement)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.