AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान नीच गिरीवर उतरला, इस्लामाबादमध्ये भारतीय डिप्लोमॅट्सच पाणी रोखलं, अजून काय-काय?

पाकिस्तानने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतीय डिप्लोमॅट्सना भरपूर त्रास दिला जातोय. कालच अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे जिहादी मानसिकतेचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी तिथून भारताला अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली.

पाकिस्तान नीच गिरीवर उतरला, इस्लामाबादमध्ये भारतीय डिप्लोमॅट्सच पाणी रोखलं, अजून काय-काय?
shehbaz sharif and asim munir
| Updated on: Aug 11, 2025 | 2:19 PM
Share

अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे जिहादी मानसिकतेचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी तिथून भारताला अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली. धरण बांधलं तर ते मिसाइल डागून फोडून टाकू असा इशारा दिला. त्यानंतर आता ISI ने पाकिस्तानात तैनात असलेल्या भारतीय उच्च आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. हाय कमिशनमधील भारतीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारमधील उच्च पदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व जाणीवपूर्वक सुरु आहे. वियना कन्वेंशनच हे उल्लंघन आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये नव्या वादाची सुरुवात झाली आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने मिळवलेला विजय आणि सिंधू जल कराराला दिलेली स्थगिती यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. त्यातूनच पाकिस्तानकडून हे नको ते प्रकार सुरु आहेत. छोटासा प्रतिकार असा याचं स्वरुप आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI च्या डोक्याने हे सर्व सुरु आहे. पाकिस्तानातील उच्चायोगातील भारतीय कर्मचाऱ्यांची दैनंदिन व्यवस्था बिघडवायची, चांगल्या वातावरणात त्यांना काम करु द्यायचं नाही. त्यासाठी हे सर्व सुरु आहे असं सरकारी सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला सांगितलं.

कसा त्रास दिला जातोय?

भारतीय उच्च आयोगाच्या परिसरात सुई नॉर्थन गॅस पाइपलाइन लिमिटेडने गॅस पाइपलाइनने टाकली आहे. पण पुरवठा जाणीवपूर्वक रोखण्यात आला आहे. स्थानिक गॅस सिलेंडर विक्रेता जो आधी हाय कमिशनमध्ये सिलेंडर पोहोचवायचा. त्याला सांगितलय की, भारतीय हाय कमिशनला सिलिंडर विक्री करायची नाही. त्यामुळे भारतीय डिप्लोमॅट्सना ओपन मार्केटमध्ये महागडे पर्याय शोधावे लागत आहेत.

वियना कन्वेंशन काय आहे?

हा त्रास फक्त इंधनापुरताच नाही, तर भारताला स्वच्छ पिण्याच पाणी मिळू नये यासाठी सुद्धा कंबर कसली आहे. भारतीय हाय कमिशनला पाणी विकू नका, असं पाणी पुरवठा विक्रेत्यांना सांगण्यात आलय. त्यामुळे भारतीय अधिकारी-कर्मचारी वर्ग त्रस्त आहे. स्थानिक नळाद्वारे येणारं पाणी सुरक्षित नाहीय. वियना कन्वेंशननुसार दूतावासाचा कारभार सुरळीत, सुरक्षित आणि आदर राखून झाला पाहिजे. पाकिस्तानकडून जे सुरु आहे ते वियना कराराच उल्लंघन आहे. थेट चर्चेऐवजी त्रास देण्यासाठी अपारंपारिक पद्धती वापरल्या जात आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.