AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक थेंबही पाणी देणार नाही.. कोर्टात भारताला मोठा दणका, पाकिस्तानचा विजय, थेट भडकून..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. भारताने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची वाट लावली. यादरम्यानच जल सिंधु करार चर्चेत आहेत. भारताने पाकिस्तानला चारही बाजूने घेरले. यादरम्यानच न्यायालयाच्या निकालावर भारताने थेट जाहीर भूमिका घेतली.

एक थेंबही पाणी देणार नाही.. कोर्टात भारताला मोठा दणका, पाकिस्तानचा विजय, थेट भडकून..
Indus Waters Treaty
| Updated on: May 17, 2026 | 8:27 AM
Share

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावात आहेत. त्यामध्येच पहलगामवरील हल्ल्यानंतर हे संबंध अधिकच तणावात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधु जल करार यामुळे संबंध अधिकच तणावात आहेत. भारताने शनिवारी कथित या प्रकरणातील मध्यस्थी न्यायालयाने 16 मे रोजी दिलेल्या आदेशाला पूर्णपणे फेटाळून लावले. भारताने स्पष्ट केले की, चुकीच्या पद्धतीने संघटन केलेल्या या न्यायालयाच्या आदेशाला आम्ही मानत नाहीत. सिंधु जल करारावरील स्थगिती कोणत्याही प्रकरणात काढणार नाहीत. न्यायालयाने भारताला दणका देत पाकिस्तानच्या बाजूने निकाल दिला. मात्र, भारताने स्पष्ट केले की, आम्हाला हा निकालच मान्य नाही. आम्ही जल सिंधु करारावरील स्थगिती कायम ठेवणार आहोत. पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाहीत.

विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जैसवाल याबाबत बोलताना म्हणाले की, बेकायदेशीर पणे तयार केलेल्या मध्यस्थी न्यायालयाने 16 मे रोजी जल ग्रहणबाबत निकाल दिला. मात्र, हा निकाल सिंधु जल संधी करारातील व्याख्यांच्या मुद्द्यावर योग्य नाही. भारत या निकालाला फेटाळून लावतो. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भारत कोणतीही पाऊले उचलणार नाही. स्थगिती कायम राहणार आहे.

कारण न्यायालयाची मध्यस्थताच बेकायदेशीर आहे. भारताने हा निकाल आपल्याला मान्य नसल्याने स्पष्ट सांगितले आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्याने मोठी खळबळ पाकिस्तानमध्ये उडाली आहे. शेतींचे मोठे नुकसान यासोबतच पाकिस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याचेही मोठे वांदे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तान करत आहे. यासोबतच भारताला गंभीर परिणामांना सामोरे जाण्याच्या धमक्या देखील दिल्या जात आहेत.

न्यायालयाच्या निकालानंतरही भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकणार नाही. न्यायालयाची मध्यस्थीच बेकायदेशीर असल्याचे भारताने म्हटले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठे पाऊस उचलली आहेत. त्यामध्येच जल सिंधु कराराला स्थगितीही दिली. जल सिंधु करारावरील स्थिगिती उठवण्याकरिता पाकिस्तान प्रयत्न करत आहे. भारतावर दबाव आणण्याचे काम पाकिस्तानकडून केले जात आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.