AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindhu : भारताचा मोठा निर्णय, आणखी दोन देशांच्या नागरिकांना इराणमधून काढणार बाहेर

Operation Sindhu : इस्रायल-इराण युद्ध सुरु असताना भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताने संधी साधली आहे. भारत ऑपरेशन सिंधूचा विस्तार करणार आहे. आपल्यासोबत आणखी दोन देशांच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणार आहे.

Operation Sindhu : भारताचा मोठा निर्णय, आणखी दोन देशांच्या नागरिकांना इराणमधून काढणार बाहेर
Operation Sindhu
| Updated on: Jun 21, 2025 | 1:39 PM
Share

इस्रायल-इराणमध्ये युद्ध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरु केलं आहे. इराणमधून विशेष विमानाने भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे. आता भारताने आपल्या ऑपरेशन सिंधूचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने शेजारच्या मित्र देशांना मदत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत आता इराणमध्ये अडकलेल्या नेपाळी आणि श्रीलंकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारत आपल्यासोबत या दोन देशातील नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचवणार आहे. चीन दक्षिण आशियामध्ये बांग्लादेश आणि पाकिस्तानसोबत मिळून नवीन आघाडी बनवत असताना भारत हे काम करणार आहे.

भारतीय दूतावासानुसार, नेपाळ आणि श्रीलंकन सरकारच्या शिफारसीवरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. नेपाळ आणि श्रीलंका हे भारताचे शेजारी देश असून रणनितीक दृष्टीने भारतासाठी हे दोन्ही महत्त्वाचे देश आहेत. आम्ही श्रीलंकन आणि नेपाळी नागरिकांची सुद्धा मदत करणार आहोत, असं भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलय. दोन्ही देशांनी ऑपरेशन सिंधू अंतर्गत आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या इराण बाहेर काढण्याची विनंती केली होती.

एक फोन नंबर जारी केलाय

भारतीय दूतावासाने यासाठी एक फोन नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या या नंबरवर संपर्क करणाऱ्या लोकांची आधी पडताळणी होईल. मग, त्यांना ऑपरेशन सिंधू अंतर्गत परत आणलं जाईल. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार इराणमध्ये त्यांचे 16 आणि इस्रायलमध्ये 5500 नागरिक आहेत. नेपाळ सरकारने सांगितलं की, इराणमध्ये त्यांच्या पाच नागरिकांना जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्री तस्करीचा आरोप आहे.

त्यांच्या सरकारने भारताकडे मागितली मदत

नेपाळ सरकारने स्वत: या नागरिकांना तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले होते. पण त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर नेपाळ सरकारने भारताकडे मदत मागितली. श्रीलंकेचे किती लोक इराणमध्ये अडकलेत, त्याचा आकडा समोर आलेला नाही. दरवर्षी 12000 श्रीलंकन नागरिक इराणमध्ये फिरायला जातात.

Follow Us
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....