AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI पेमेंटची आता सिंगापूरात घौडदौड, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सेवा सुरू, NRI तसेच विद्यार्थ्यांना होणार फायदा

भारतातील डिजीटल ट्रांझक्शन पर्याय बनलेल्या UPI पेमेंटला आता सिंगापूरनेही स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली एच लूंग यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

UPI पेमेंटची आता सिंगापूरात घौडदौड, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सेवा सुरू, NRI तसेच विद्यार्थ्यांना होणार फायदा
PM MODIImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 21, 2023 | 3:31 PM
Share

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूरच्या संबंधात मंगळवारी नविन अध्याय जोडला गेला आहे. भारतातील डीजिटल व्यवहारासाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या युपीआयला आता सिंगापूरने स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली.एच.लूंग यांच्यात भारताचे UPI आणि सिंगापूरच्या PAYNOW दरम्यान क्रॉस – बॉर्डर कनेक्टिविटी करार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील नागरीकांना क्रॉस – बॉर्डर पेमेंट करणे सोपे होणार आहे.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की UPI आणि PayNow यांना एकत्र जोडल्याने भारत-सिंगापूरच्या संबंधाना एक वेगळा आयाम मिळणार आहे. युपीआय पेमेंट आता दुसऱ्या देशातही आपले पाऊल ठेवत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि सिंगापूरच्या मौद्रिक प्राधिकरणाचे मॅनेजिंग डायरेक्टर रवि मेनन यांनी या क्रॉस -बॉर्डर सुविधेची सुरूवात केली.

प्रवासी भारतीयांना होणार फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या ‘क्रॉस बॉर्डर फिनटेक कनेक्टिविटी’ मुळे एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. आजपासून सिंगापूर आणि भारताचे लोक आपल्या मोबाईल फोनद्वारे त्यांच्या देशात करतात तसेच डीजिटल पेमेंट एकमेकांशी करू शकणार आहेत.

या सुविधेचा सर्वात जास्त फायदा प्रवासी भारतीय, विद्यार्थी आणि व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. या सुविधेमुळे सिंगापूरमध्ये काम करणारे भारतीय लोक आपल्या घरी सहजतेने पैसे पाठवू शकणार आहेत. तसेच तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून पैसे मागविणे सोपे होणार आहे.

रोखीचे व्यवहार कमी होतील

युपीआय भारताचे सर्वात आवडती पेमेंट सिस्टीम बनले आहे. साल २०२२ मध्ये युपीआयद्वारे 1,26,000 अब्ज रूपयांचे व्यवहार झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहारात होत असल्याने या देशी पेमेंटला सर्वात विश्वासार्ह मानल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहारात होत असल्याने या देशी पेमेंटला सर्वात विश्वासार्ह मानल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की येत्या दिवसात डिजिटल वॉलेटद्वारे होणारे व्यवहार रोखीच्या व्यवहारांना मागे टाकतील असेही मोदी यांनी सांगितले.

या देशांशी झाला करार

सिंगापूरच्या आधी युपीआयने देशाबाहेर अनेक देशांशी देखील करार केला आहे. भारताच्या नेशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची शाखा असलेल्या एनपीसीआय इंटरनेशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL) भूतानच्या रॉयल मोनेटरी अथॉरीटी बरोबर करार केला आहे. भारताची युपीआय पेमेंट सर्व्हीसला मान्यता देणार नेपाळ हा पहिला देश ठरला आहे. नेपालच्या मनम इंफोटेक एंड गेटवे पेमेंट्स सर्विसने युपीआय पेमेंटची सुरूवात केली आहे. तसेच मलेशिया, ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीने देखील युपीआयला मान्यता दिली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.