AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानी लोकं का करतात भारतावर प्रेम आणि पाकिस्तानचा द्वेष, पाकच्या युट्युबरने केला खुलासा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच चांगले नव्हते. पाकिस्तानमधील दहशतवादाने भारतावर अनेकदा हल्ले केले. पाकिस्तानने अशा दहशतवाद्यांना आश्रय दिला. पण असं असलं तरी अफगाणिस्तानचा मात्र भारतावर अधिक विश्वास आहे. पाकिस्तानी लोकांवर अफगाणी लोकं आता द्वेष करु लागले आहेत. यामागचं कारण काय आहे जाणून घ्या.

अफगाणिस्तानी लोकं का करतात भारतावर प्रेम आणि पाकिस्तानचा द्वेष, पाकच्या युट्युबरने केला खुलासा
| Updated on: Jul 22, 2024 | 4:18 PM
Share

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रचंड द्वेष वाढला आहे. नुकताच जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या हातात अफगाणिस्तानचा ध्वज होता. पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्यांना तालिबान सरकार पाठिंबा देत असल्याचा आरोप ही पाकिस्तानने केलाय. अफगाणिस्तानातील लोक पाकिस्तानचा एवढा द्वेष करताय दुसरीकडे भारतासोबतचे त्यांचे संबंध सातत्याने घट्ट होत आहेत. पाकिस्तानातील तज्ज्ञांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

अफगाणी लोक का करतात पाकिस्तानचा द्वेष?

पाकिस्तानी तज्ञ कमर चीमा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या मागचे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला. कमर चीमा यांनी वकील हमीद बेसानी यांच्याशी चर्चा केलीये. बेसानी म्हणाले की, तालिबानच्या पहिल्या राजवटीत पाकिस्तानने त्यांच्यावर अत्याचार केला होता. त्यामुळे पाकिस्तानबद्दल त्यांच्या मनात द्वेष वाढला आहे. तालिबानवर आधी पाकिस्तानचा खूप प्रभाव होता. पाकिस्तानच्या लोकांना अफगाणिस्तान हे आपलेच राज्य वाटायचे. पण अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर जेव्हा तालिबानने तेथून माघार घेतली आणि पाकिस्तानी पत्रकार काबूलला पोहोचले तेव्हा त्यांना पहिल्यांदाच अफगाण जनतेच्या द्वेषाला सामोरे जावे लागले होते.

बेसानी यांनी सांगितले की, परिस्थिती इतकी वाईट होती की, पाकिस्तानी पत्रकार भारतीय असल्याचं सोंग करत होते. अफगाणिस्तानसाठी भारताने नेहमीच मदत केल आहे. भारत तेथे धरणे बांधत आहे. भारत त्यांच्यासाठी सुख सुविधी निर्माण करत आहे. त्यामुळे भारत हा अफगाणिस्तानसाठी मित्र देश बनला आहे. तर पाकिस्तानला ते अडचणींना जबाबगदार असलेले देश मानत आहेत.

कमर चीमा यांनी सांगितले की, आता अमेरिकाही पाकिस्तानला दोष देत आहे. तालिबाननेही पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानी सेनापतींनी तालिबानची निर्मिती केली होती, जेणेकरून पाकिस्तानमधील पश्तून फुटीरतावाद दाबता येईल. त्यामुळे आता पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पाकिस्तान केवळ डॉलरच्या लालसेपोटी अफगाण लोकांना येथे ठेवत आहे आणि अफगाण लोकांनाही हे माहित आहे. पाकिस्तानचे नेते अफगाणिस्तानला दिलेल्या मदतीबद्दल वारंवार बोलून अफगाणी लोकांचा अपमान करतात, त्यामुळे हा द्वेष वाढत आहे.

भारत अफगाणिस्तानच्या जवळ कसा झाला?

भारताने अफगाणिस्तानचा विश्वास जिंकला आहे. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानचे अफगाणिस्तानविरोधी कोणतेही रहस्य उघड झाले, तेव्हा भारताने शांततेने त्याचा प्रचार केला. आज अफगाणिस्तानचे लोक दिल्ली आणि मुंबईत आहेत. ते तिथे शिकत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत. याचा फायदा भारताला झाला आणि आज अफगाणिस्तानचे लोक नवी दिल्लीला आपला खरा मित्र मानतात.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.