AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताआधी पाकिस्तानशी ट्रम्प करणार ट्रेड डील? भारतावर काय होणार परिणाम

भारत आणि पाकिस्तानचे संबंध पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर कमालीचे तणावाचे असताना अमेरिका पाकिस्तानला जवळ करीत त्यांच्याशी आधी ट्रेड डील करण्याच्या बेतात आहे. त्याचा भारतावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे आहे.

भारताआधी पाकिस्तानशी ट्रम्प करणार ट्रेड डील? भारतावर काय होणार परिणाम
| Updated on: Jul 29, 2025 | 3:44 PM
Share

भारताच्या आधीच आपला शेजारी पाकिस्तानशी अमेरिकेचा व्यापार करार होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब सोमवारी रात्री उशीरा अमेरिकेला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे दोन आठवड्यातील हा त्यांचा दुसरा अमेरिका दौरा आहे. ज्यामुळे हे स्पष्ट संकेत मिळत आहेत की आता करार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. याचा भारतावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे आहे.

असे म्हटले जात आहे की या वेळी मुहम्मद औरंगजेब यांचा दौरा अंतिम बोलणी करण्यासाठी आहे. यामुळे असा तर्क लावला जात आहे की वॉशिग्टन आणि इस्लामाबाद दरम्यान व्यापारी करारावर अंतिम मोहर लावली जाऊ शकते.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी आधीच म्हटले आहे की अमेरिकेसोबत ट्रेड डील आता अंतिम टप्प्यात पोहचली असून तिला काही दिवसात अंतिम स्वरुप प्राप्त होईल. असे असेल तरी अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने यावर आतापर्यंत कोणतेही अधिकृत व्यक्तव्य केलेले नाही.

अमेरिकेने जादा कर हटवावा- पाकिस्तान

सध्या पाकिस्तानकडून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर सुमारे २९ टक्के आयात शुल्क ( टैरिफ ) लावले जाते. आता पाकिस्तान अशी इच्छा आहे की हा कर हटवून झीरो टैरिफ केला जावा म्हणजे त्यांचा माल अमेरिकेत स्वस्तात पाठवला जावा.२०२४ मध्ये अमेरिका आणि पाकिस्तान दरम्यान ७.३ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता, ज्यात पाकिस्तानला सुमारे ३ अब्ज व्यापार लाभ ( Trade Surplus) मिळाला होता. जर अमेरिकेने टैरिफ कमी केला तर केवळ पाकिस्तानची निर्यात वाढेल असे नव्हे अमेरिकन कंपन्यांना पाकिस्तानात गुंतवणूक करण्यासाठी नव्या सवलती देखील देईल.

भारतावर या कराराचा काय परिणाम?

अमेरिका आणि पाकिस्तान डीलचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही थेट परिणाम होणार नाही. कारण भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार अनेक पटीने वाढला आहे. परंतू ही बाब केवळ व्यापाराची नाही, तर धोरणात्मक आहे.

मे २०२५ मध्ये जेव्हा भारत आणि पाकस्तान यांच्या तणाव वाढला होता. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की दोन्ही देशांना शांत करण्यासाठी ट्रेड डीलचा वादा केला होता. भारताने या दाव्याने नाकारले असून जर अमरिकेने आधी पाकिस्तानासोबत करार केला तर हा भारतासाठी एक धोरणात्मक संकेत असेल.

भारत-अमेरिका ट्रेड डीलची स्थिती काय?

भारत आणि अमेरिकेदरम्यान ट्रेड डीलची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. वृत्तानुसार ऑगस्ट सुरुवातीला दोन्ही देशात सामंजस्य करारावर अंतिम सह्या होऊ शकतात. परंतू जर याआधी पाकिस्तानशी अमेरिकेची डील झाली तर हे ट्रम्प यांच्या त्या धोरणाशी सुसंगत असेल ज्यात दबाव टाकून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

भारतास सतर्क रहावे लागेल

या संपूर्ण प्रकरणाचा भारतावर आर्थिक परिणाम जरी कमी होणार असला तर जागतिक राजकीय आणि परराष्ट्र धोरणात्मकदृष्ट्या ही चिंतेची गोष्ट आहे. यामुळे अमेरिकेची प्राथमिकता आणि धोरण साफ झळकत आहे. भारताला हे समजावे लागले की जागतिक राजकारणात मैत्री आणि रणनीती सतत बदलत असते. भारत अमेरिकेसोबत मोठे संरक्षण आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात भागीदारी करत असताना अशा वेळी पाकिस्तानला प्राथमिकता देणे यामुळे भारतासाठी राजकीय अडचणी होऊ शकतात.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा