AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी गुड न्यूज, भारताने करून दाखवलेच, थेट अर्थव्यवस्था..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगाला नाकीनऊ आले. युद्धबंदीची घोषणा अमेरिका आणि इराणकडून करण्यात आली पण अजूनही संकट टळले नसल्याचे पुढे आले. यादरम्यानच भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे. भारताने करून दाखवल्याचे बोलले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी गुड न्यूज, भारताने करून दाखवलेच, थेट अर्थव्यवस्था..
Indian Economy
| Updated on: Apr 09, 2026 | 8:56 AM
Share

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जग संकटात आहे. जागतिक बाजारपेठेवर या युद्धाचा थेटपणे परिणाम होताना दिसला. जागतिक बाजारात तेलाच्या किमती सतत वाढताना दिसत आहे. जग होरपळले जात आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा झाली. या संकटामुळे जग संकटात असताना भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे. जगात अत्यंत मोठ्या वेगाने पुढे जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे पुढे आले. इराण आणि अमेरिका युद्धात जगाचे तीनतेरा वाजलेले असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. जागतिक बँकेनेही हे मान्य केले. भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून एक दिलासादायक बातमी दिली आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.6 च्या वेगाने पुढे गेली.

कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम बघायला मिळाला. पण भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे पुढे आले. जागतिक बँकेने बुधवारी एप्रिल 2026 साठीचा दक्षिण आशिया आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.6 ने वाढल्याचे नमूद करण्यात आले.

भारताच्या अर्थव्यवस्थेचे हे मोठे यश म्हणावे लागले. कारण इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. यासोबतच शेअर मार्केटवरही या युद्धाचा परिणाम बघायला मिळाला. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये, जागतिक बँकेने 6.3 टक्के विकास दराचा अंदाज वर्तवला होता. त्या तुलनेने भारताने धमाकेदार कामगिरी केल्याचे बघायला मिळत आहे.

जागतिक बँकेने आपल्या अहवालात भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवताना पुढे म्हटले आहे, जीएसटी दरांमध्ये म्हणजेच वस्तू आणि सेवांवरील करात कपात झाल्यामुळे आर्थिक वर्षात वाढ झाली. इराण आणि अमेरिका युद्धात भारतासाठी ही आनंदाची बातमी म्हणावे लागेल. भारतात सध्या एलपीजी गॅसचे मोठे संकट आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने तुटवडा निर्माण झाला. भारतासोबतची मैत्री लक्षात घेता इराणकडून भारतीय जहाज काही प्रमाणात सोडले जात आहेत.

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.