AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

60 वर्षे जगणारा माणूस एकूण किती हजार किलो अन्न खातो? वाचा थक्क करणारा हिशोब

माणसाच्या आयुष्यात खाणं ही एक नैसर्गिक आणि आवश्यक गरज असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात एकूण किती अन्न खातो? चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नाचं योग्य उत्तर

60 वर्षे जगणारा माणूस एकूण किती हजार किलो अन्न खातो? वाचा थक्क करणारा हिशोब
man eating food
| Edited By: | Updated on: Jul 15, 2025 | 7:46 PM
Share

आपण रोजच्या जगण्यात जेवण घेतो, ते आपल्या शरीराची ऊर्जा आणि आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की एक सामान्य माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यात नेमकं किती अन्न खातो? विशेषतः 60 वर्षांच्या कालावधीत. हा प्रश्न थोडा विचित्र वाटू शकतो, पण याचं उत्तर जरा धक्कादायक आणि गंमतीशीरही आहे.

रोजच्या जेवणाचा हिशेब 60 वर्षांवर गेला की, मानवी शरीराला चालण्यासाठी रोज अन्न लागते. काही लोक दिवसभरात 2 वेळा खातात, काही 3 वेळा, तर काही 4-5 वेळा थोडं-थोडं खाणं पसंत करतात. पण जेवढं खाल्लं जातं, ते जमा होतं आणि 60 वर्षांमध्ये त्याचं रूपांतर ‘टनांमध्ये’ होऊन जातं.

एका अंदाजानुसार, एक सामान्य माणूस आपल्या संपूर्ण जीवनात सुमारे 35 टन अन्न खातो. हो, चकित व्हाल, पण ही खरी माहिती आहे! 35 टन म्हणजे जवळपास 35,000 किलो अन्न. इतकं अन्न खाणं म्हणजे सुमारे 9 आशियाई हत्तींच्या वजनाइतकं! (एका हत्तीचं सरासरी वजन सुमारे 4,000 किलो धरलं जातं.)

जर आपण फक्त 60 वर्षांचा हिशेब लावला, तर 60 वर्षांमध्ये 21,900 दिवस होतात. आणि यामध्ये एखादा माणूस सरासरी 12,045 किलो अन्न खातो, म्हणजेच जवळपास 12 टन अन्न!

यात दैनंदिन जेवण, नाश्ता, पेय पदार्थ, फळं, दूध, मिष्टान्न, शिजवलेलं आणि न शिजवलेलं अन्न, तसेच द्रव स्वरूपातलं अन्नही धरलं जातं.

भारतीय खवय्य्यांची खासियत

भारतात खाण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत कुणी चपात्या खातं, कुणाला भात आवडतो, कुणी शाकाहारी असतो, तर कुणी मांसाहारी. याशिवाय स्ट्रीट फूड आणि जंक फूडची तर येथे चंगळ आहेच! त्यामुळे खाण्याच्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये फरक असतो. पण वरील अंदाज एका सामान्य भारतीयाच्या डाएटवर आधारित आहे.

हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जितक्या प्रमाणात अन्न घेतो, तितकंच बर्नही केलं पाहिजे. अन्यथा ते चरबीच्या रूपात साठू लागतं आणि मग वाढतं वजन, वाढतो त्रास! याचमुळे अनेक लोक आज मोटाप्याचं शिकार होतात.

शेवटी, आपल्या आयुष्यातील अन्नाचा हा हिशेब थोडा गंमतीशीर असला तरी शरीरासाठी अन्न किती आवश्यक आहे, याचं हे एक प्रभावी उदाहरण आहे. मात्र, योग्य प्रमाणात खाणं आणि शरीराला तितकीच हालचाल देणं ही खरी किमया आहे. कारण ‘जसा आहार, तसं आरोग्य’ हे शतकानुशतकांपासूनच खरं आहे.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.