AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK Quiz: भारतात पाकिस्तान? या राज्यात Pakistan नावाचे गाव… बहुसंख्य हिंदू असताना या खेड्याला का पडले हे नाव?

Pakistan Name Village in India: भारत आणि पाकिस्तानचे हाडवैर जगाला माहिती आहे. पाकिस्तान हा भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणत असल्याने हा देश भारताचा विरोधक मानल्या जातो. पण याच देशाच्या नावाने या राज्यात एक गाव आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

GK Quiz: भारतात पाकिस्तान? या राज्यात Pakistan नावाचे गाव... बहुसंख्य हिंदू असताना या खेड्याला का पडले हे नाव?
भारतात पाकिस्तान?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 23, 2026 | 3:09 PM
Share

Pakistan Name Village in India:  देशात पाकिस्तान नावाचे गाव  आहे हे वाचून अनेकांना  धक्का बसला असेल. पण  या राज्यात पाकिस्तान नावाचे गाव आहे. पाकिस्तानशी भारताचे हाडवैर जगजाहीर आहे. धर्माच्या नावावर पाकिस्तान भारतातून फाळणीनंतर स्वतंत्र झाला.  तर भारतात  या कट्टर हाडवैऱ्याचे नाव असलेले गाव आहे.  विशेष म्हणजे या पाकिस्तान नावाच्या गावात मुस्लिम नाही तर हिंदू राहतात. या गावाच्या नावावरून सातत्याने टीका होऊ लागल्यानंतर लोकांनी गावाच्या नावाची पाटी बदलली. पण प्रशासकीय स्तरावर या गावाची ओळख पाकिस्तान अशीच आहे.

बिहारमध्ये पाकिस्तान नावाचे गाव

बिहार राज्यातील पुर्णिया जिल्ह्यात श्रीनगर हा एक भाग आहे. त्यात सिंधीया ही पंचायत समिती आहे. पुर्णिया या शहरापासून 30 किलोमीटरवर सिंधीया आहे. त्यातंर्गत पाकिस्तान नावाचे गाव आहे. या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना या गावाला पाकिस्तान हे नाव कसं पडलं हा एक रोचक इतिहास आहे. हिंदू-मुस्लिमांमधील सद्भावाची झालर त्यामागे आहे. इथे हिंदू आदिवासी राहतात.

का पडेल पाकिस्तान हे नाव?

1947 साली भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. तेव्हा भारतातील अनेक भागातून मुस्लिम कुटुंब पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झाले. बिहारमधील या गावातील मुस्लिम कुटुंब पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात स्थलांतरीत झाली. त्यांची आठवण म्हणून या गावातील हिंदूंनी गावाचे नाव पाकिस्तान असे ठेवल्याचे म्हटले जाते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाली आहेत. या युद्धानंतर या गावाचं नाव स्थानिकांना सातत्याने खटकत आले आहे. या गावातील मुलांना लग्नासाठीही मोठी अडचण येऊ लागली. तर मुलींची लग्नी जुळवतानाही या नावामुळे मोठी अडचण येत होती. या आदिवासी पाड्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतो. या गावाकडं जाण्याचा पक्का रस्ताही नसल्याने गावकरी नाराज होते. अखेर त्यांनी गावाचे नाव बदलण्याचे ठरवले. गावकऱ्यांनी पाकिस्तान नावाची पाटी काढली आणि बिरसानगर असे नाव दिले. या गावात संथाल आदिवासी राहतात. या गावाचे नाव बिरसानगर असे करण्यात आले असले तरी अनेक गावकऱ्यांच्या आधार कार्डवर पाकिस्तान असेच नाव असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी सरकार दरबारी पाकिस्तान ही ओळख पुसण्याची मागणी केली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा