AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK Quiz: भारतात पाकिस्तान? या राज्यात Pakistan नावाचे गाव… बहुसंख्य हिंदू असताना या खेड्याला का पडले हे नाव?

Pakistan Name Village in India: भारत आणि पाकिस्तानचे हाडवैर जगाला माहिती आहे. पाकिस्तान हा भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणत असल्याने हा देश भारताचा विरोधक मानल्या जातो. पण याच देशाच्या नावाने या राज्यात एक गाव आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

GK Quiz: भारतात पाकिस्तान? या राज्यात Pakistan नावाचे गाव... बहुसंख्य हिंदू असताना या खेड्याला का पडले हे नाव?
भारतात पाकिस्तान?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 23, 2026 | 3:09 PM
Share

Pakistan Name Village in India:  देशात पाकिस्तान नावाचे गाव  आहे हे वाचून अनेकांना  धक्का बसला असेल. पण  या राज्यात पाकिस्तान नावाचे गाव आहे. पाकिस्तानशी भारताचे हाडवैर जगजाहीर आहे. धर्माच्या नावावर पाकिस्तान भारतातून फाळणीनंतर स्वतंत्र झाला.  तर भारतात  या कट्टर हाडवैऱ्याचे नाव असलेले गाव आहे.  विशेष म्हणजे या पाकिस्तान नावाच्या गावात मुस्लिम नाही तर हिंदू राहतात. या गावाच्या नावावरून सातत्याने टीका होऊ लागल्यानंतर लोकांनी गावाच्या नावाची पाटी बदलली. पण प्रशासकीय स्तरावर या गावाची ओळख पाकिस्तान अशीच आहे.

बिहारमध्ये पाकिस्तान नावाचे गाव

बिहार राज्यातील पुर्णिया जिल्ह्यात श्रीनगर हा एक भाग आहे. त्यात सिंधीया ही पंचायत समिती आहे. पुर्णिया या शहरापासून 30 किलोमीटरवर सिंधीया आहे. त्यातंर्गत पाकिस्तान नावाचे गाव आहे. या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना या गावाला पाकिस्तान हे नाव कसं पडलं हा एक रोचक इतिहास आहे. हिंदू-मुस्लिमांमधील सद्भावाची झालर त्यामागे आहे. इथे हिंदू आदिवासी राहतात.

का पडेल पाकिस्तान हे नाव?

1947 साली भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. तेव्हा भारतातील अनेक भागातून मुस्लिम कुटुंब पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झाले. बिहारमधील या गावातील मुस्लिम कुटुंब पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात स्थलांतरीत झाली. त्यांची आठवण म्हणून या गावातील हिंदूंनी गावाचे नाव पाकिस्तान असे ठेवल्याचे म्हटले जाते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाली आहेत. या युद्धानंतर या गावाचं नाव स्थानिकांना सातत्याने खटकत आले आहे. या गावातील मुलांना लग्नासाठीही मोठी अडचण येऊ लागली. तर मुलींची लग्नी जुळवतानाही या नावामुळे मोठी अडचण येत होती. या आदिवासी पाड्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतो. या गावाकडं जाण्याचा पक्का रस्ताही नसल्याने गावकरी नाराज होते. अखेर त्यांनी गावाचे नाव बदलण्याचे ठरवले. गावकऱ्यांनी पाकिस्तान नावाची पाटी काढली आणि बिरसानगर असे नाव दिले. या गावात संथाल आदिवासी राहतात. या गावाचे नाव बिरसानगर असे करण्यात आले असले तरी अनेक गावकऱ्यांच्या आधार कार्डवर पाकिस्तान असेच नाव असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी सरकार दरबारी पाकिस्तान ही ओळख पुसण्याची मागणी केली आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल