AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकी-कतरिनाच्या लग्नाचा शाही थाट, जाणून घ्या राजस्थानच्या छोट्याशा शहरातील आलिशान हॉटेलची कहाणी!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नाचे विधी, हॉटेल्स, आलिशान विवाहसोहळे यांची इंटरनेटवर बरीच चर्चा होत आहे. राजस्थानच्या रणथंबोरजवळील एका छोट्या गावात ही सेलेब जोडी लग्न करणार आहे.

विकी-कतरिनाच्या लग्नाचा शाही थाट, जाणून घ्या राजस्थानच्या छोट्याशा शहरातील आलिशान हॉटेलची कहाणी!
VicKat
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 1:30 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नाचे विधी, हॉटेल्स, आलिशान विवाहसोहळे यांची इंटरनेटवर बरीच चर्चा होत आहे. राजस्थानच्या रणथंबोरजवळील एका छोट्या गावात ही सेलेब जोडी लग्न करणार आहे. लग्नाच्या चर्चेदरम्यान दोघेही जिथे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत त्या हॉटेलची बरीच चर्चा आहे. खरंतर, या जोडीने लग्नासाठी जे हॉटेल निवडले आहे, ते राजस्थानची राजधानी जयपूरपासून 110 किमी दूर असलेल्या गावात बनवले आहे, त्यामुळे लोक त्याची चर्चा करत आहेत.

अशा परिस्थितीत लोकांना असा प्रश्न पडला आहे की, या ठिकाणात किंवा हॉटेलमध्ये असे काय खास आहे की, या सेलिब्रिटींनी हॉटेलला लग्नासाठी योग्य ठिकाण मानले. तुम्हालाही असा प्रश्न पडलाय? चला तर, जाणून घेऊया या हॉटेलमध्ये काय खास आहे आणि या हॉटेलच्या इतिहासाशी संबंधित काही खास माहिती….

कुठे होतय लग्न?

विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. हे हॉटेल सवाई माधोपूरच्या बरवारा चौथ गावात आहे. हेरिटेज हॉटेल असल्याने हे हॉटेल अनेक श्रीमंत लोकांची पहिली पसंती आहे. ‘सिक्स सेन्सेस हॉटेल’ असे हॉटेलचे नाव आहे. हॉटेल सिक्स सेन्स ग्रुपला ते भाडेतत्त्वावर दिले आहे, म्हणून त्याला ‘सिक्स सेन्सेस बारवारा किल्ला’ असे म्हणतात.

इतके खास का आहे?

लोकेशनबद्दल बोलायचे झाले, तर हॉटेलचे लोकेशन असे काही खास नाही. हॉटेलमधून पाहिल्यावर टेकडीवर चौथ मातेचे एक मंदिर दिसते, ज्यासाठी हे शहर खूप प्रसिद्ध आहे. त्याच वेळी येथून एक पूलही दिसतो आणि शहराचे दृश्यही दिसते. पण, या हॉटेलचा इतिहास याला अधिक खास बनवतो आणि हे लक्झरी हॉटेल लोकांना आकर्षित करते.

पूर्वी हे हॉटेल बरवारा किल्ला होता, जो चौहानांनी 14 व्या शतकात बांधला होता. परंतु, 1734 मध्ये हे हॉटेल राजावत घराण्याने जिंकले होते. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा बरवराचे राजपूत आणि त्यांच्या कुटुंबाने जयपूर राज्याच्या सशस्त्र दलांशी लढाईत भाग घेतला. आता राजघराण्याचे वंशज पृथ्वीराज सिंह यांनी एस्पायर ग्रुपच्या सहकार्याने हे हॉटेल बनवले आहे.

हॉटेलमध्ये काय खास आहे?

5.5 एकरमध्ये बांधलेल्या या हॉटेलची बाह्य भिंत 5 फूट लांब आहे, जी अनेक ठिकाणी 20 फुटांपर्यंत उंच आहे. हॉटेलमध्ये दोन रेस्टॉरंट्स, बार आणि लाउंज, स्पा, फिटनेस सेंटर, दोन स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल, बुटीक आणि किड्स क्लब आहेत. संपूर्ण हॉटेलमध्ये शेखावती कलेचा वापर करण्यात आला आहे.

एका दिवसाचे भाडे किती?

जर, आपण याच्या एका दिवसाच्या भाड्याबद्दल बोललो, तर येथे एका दिवसासाठी राहण्याचा खर्च 70 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.

हेही वाचा :

Aarya Season 2 | माधुरी दीक्षितने सांगितली सुष्मिता सेनची सर्वात मोठी कमजोरी, समोर आणला ‘आर्याचा’ थरारक प्रवास

Happy Birthday Shatrughan Sinha | …जेव्हा होणाऱ्या सासूने शत्रुघ्न सिन्हांसोबत लेकीचं लग्न लावण्यास नकार दिला!

‘त्यांच्याशी हस्तांदोलन करताच तोंडून आपोआप जय हिंद निघायचं’, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बॉलिवूडची आदरांजली

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.