AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढेल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असून, देशाच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या वेळी मान्सूनने कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेच्या मध्यातच प्रवेश केला आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, तर देशभरात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाळ्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढेल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात...
मान्सून
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 5:00 PM
Share

मुंबई : संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असून, देशाच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या वेळी मान्सूनने कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेच्या मध्यातच प्रवेश केला आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, तर देशभरात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान आणि संभाव्य तिसऱ्या लाटेत मान्सून अर्थात पावसाळ्याचा खरोखर परिणाम होईल का? आणि जर तो झालाच तर किती असेल? (Will corona infection increase during monsoons know what experts says).

अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी आपापल्यापरीने हे प्रश्न त्याची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चला तर, जाणून घेऊया या विषयावर तज्ज्ञ काय म्हणतात…

पावसाचा परिणाम होईल

काही डॉक्टरांच्या मते, पावसाचा कोरोना विषाणूवरही परिणाम होतो. ते म्हणतात की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ड्रॉपलेट्सचे खूप मोठे योगदान होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि दुसर्‍या लाटेमध्ये कोरोना याच ड्रॉपलेट्समधून पसरला होता. तज्ज्ञ म्हणतात की, हवामानातील आर्द्रतेमुळे कोरोना आणि इतर विषाणूजन्य रोगांचा संसर्ग अधिक प्रमाणात होतो. आर्द्रता कमी झाल्यामुळे, विषाणूची वाढ होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत पावसाळ्याचा निश्चितच कोरोनावर परिणाम होईल.

हवामानातील आर्द्रतेमुळे संसर्गाचा वेग वाढेल!

मागील वर्षी, डेलावेयर विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोगांचे शास्त्रज्ञ जेनिफर होर्ने म्हणाले की, पावसाचे पाणी व्हायरस नष्ट करू शकत नाही. यामुळे, विषाणूचा प्रसार आणि प्रसार होण्याची गती देखील कमी होणार नाही. म्हणजेच आपण आपले हात केवळ पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, तर त्यासाठी आपल्याला आपल्या हातावर साबण लावावा लागेल. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील अप्लाईड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इव्हान्स म्हणतात की, पावसामुळे कोरोना विषाणूवर काय परिणाम होईल, हे अद्याप कळलेले नाही. तथापि, बहुतेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पावसातील ओलाव्यामुळे विषाणू अधिक तीव्र होतो.

संसर्ग होण्याचा धोका अधिक!

पावसामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढेल. बर्‍याच तज्ज्ञांचे असे मत आहे की, पावसाचे पाणी साबणा प्रमाणे पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम नाही. म्हणजेच आपण आपले हात केवळ पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, तर त्यासाठी आपल्याला आपल्या हातावर साबण लावावा लागेल. तथापि, वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य, औषध आणि साथीच्या रोगांचे प्राध्यापक जेई बेटेन वेगळा विचार करतात. ते म्हणतात की, पाऊस कोरोना विषाणू सौम्य (विरघळवून कमकुवत करणे) करू शकतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये धूळ विलीन होते आणि वाहून जाते, त्याच प्रकारे हा विषाणू देखील वाहून जाऊ शकतो.

(Will corona infection increase during monsoons know what experts says)

हेही वाचा :

देशात येत्या 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, लाट रोखणं अशक्य; ‘एम्स’च्या प्रमुखाने दिला इशारा

लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी : आरोग्य मंत्रालय

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.