AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढेल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असून, देशाच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या वेळी मान्सूनने कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेच्या मध्यातच प्रवेश केला आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, तर देशभरात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाळ्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढेल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात...
मान्सून
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 5:00 PM
Share

मुंबई : संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असून, देशाच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या वेळी मान्सूनने कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेच्या मध्यातच प्रवेश केला आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, तर देशभरात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान आणि संभाव्य तिसऱ्या लाटेत मान्सून अर्थात पावसाळ्याचा खरोखर परिणाम होईल का? आणि जर तो झालाच तर किती असेल? (Will corona infection increase during monsoons know what experts says).

अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी आपापल्यापरीने हे प्रश्न त्याची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चला तर, जाणून घेऊया या विषयावर तज्ज्ञ काय म्हणतात…

पावसाचा परिणाम होईल

काही डॉक्टरांच्या मते, पावसाचा कोरोना विषाणूवरही परिणाम होतो. ते म्हणतात की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ड्रॉपलेट्सचे खूप मोठे योगदान होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि दुसर्‍या लाटेमध्ये कोरोना याच ड्रॉपलेट्समधून पसरला होता. तज्ज्ञ म्हणतात की, हवामानातील आर्द्रतेमुळे कोरोना आणि इतर विषाणूजन्य रोगांचा संसर्ग अधिक प्रमाणात होतो. आर्द्रता कमी झाल्यामुळे, विषाणूची वाढ होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत पावसाळ्याचा निश्चितच कोरोनावर परिणाम होईल.

हवामानातील आर्द्रतेमुळे संसर्गाचा वेग वाढेल!

मागील वर्षी, डेलावेयर विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोगांचे शास्त्रज्ञ जेनिफर होर्ने म्हणाले की, पावसाचे पाणी व्हायरस नष्ट करू शकत नाही. यामुळे, विषाणूचा प्रसार आणि प्रसार होण्याची गती देखील कमी होणार नाही. म्हणजेच आपण आपले हात केवळ पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, तर त्यासाठी आपल्याला आपल्या हातावर साबण लावावा लागेल. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील अप्लाईड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इव्हान्स म्हणतात की, पावसामुळे कोरोना विषाणूवर काय परिणाम होईल, हे अद्याप कळलेले नाही. तथापि, बहुतेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पावसातील ओलाव्यामुळे विषाणू अधिक तीव्र होतो.

संसर्ग होण्याचा धोका अधिक!

पावसामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढेल. बर्‍याच तज्ज्ञांचे असे मत आहे की, पावसाचे पाणी साबणा प्रमाणे पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम नाही. म्हणजेच आपण आपले हात केवळ पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, तर त्यासाठी आपल्याला आपल्या हातावर साबण लावावा लागेल. तथापि, वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य, औषध आणि साथीच्या रोगांचे प्राध्यापक जेई बेटेन वेगळा विचार करतात. ते म्हणतात की, पाऊस कोरोना विषाणू सौम्य (विरघळवून कमकुवत करणे) करू शकतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये धूळ विलीन होते आणि वाहून जाते, त्याच प्रकारे हा विषाणू देखील वाहून जाऊ शकतो.

(Will corona infection increase during monsoons know what experts says)

हेही वाचा :

देशात येत्या 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, लाट रोखणं अशक्य; ‘एम्स’च्या प्रमुखाने दिला इशारा

लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी : आरोग्य मंत्रालय

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.