AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी : आरोग्य मंत्रालय

नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना जरी कोरोनाची लागण झाली, तरी त्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण हे 75-80 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी : आरोग्य मंत्रालय
Lav Agrawal
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 7:29 PM
Share

नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाचा वेग (CoronaVirus) काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल (Lav Agrawal) यांच्या माहितीनुसार, 3 मे पासून रिकव्हरी रेट वाढत असून, सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमालीची घटत आहे. 11 जून ते 17 जूनदरम्यान, 513 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. गेल्या 24 तासात देशात 62,480 नवे रुग्ण सापडले. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 11 दिवसांपासून रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी दिसत आहे. (Vaccines Cut Hospitalisation Risk by 80%, Give 94% Protection Against Covid-19, Health Ministry)

दरम्यान, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना जरी कोरोनाची लागण झाली, तरी त्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण हे 75-80 टक्क्यांपेक्षा कमी आहे. नव्या अभ्यासात हे समोर आलं आहे. इतकंच नाही तर लस घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं गरज केवळ 8 टक्के इतकी आहे. तर अशा रुग्णांना ICU मध्ये ठेवण्याचं प्रमाण केवळ 6 टक्के इतकं आहे.

ग्रामीण भागात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांना संसर्ग होण्याचा दर 56 टक्के तर 18 पेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचं प्रमाण 63 टक्के इतकं आहे, अशी माहिती डॉक पॉल यांनी दिली. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असला, तरी त्याचं प्रमाण कमी आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम? 

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हैदोस मांडला. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज असून, लहान मुलांना बाधा होण्याची भीती आहे. त्या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकार नियोजन करत असल्याचं, लव अग्रवाल यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

साबरमती नदीच्या पाण्यातही कोरोना विषाणू आढळला, सर्व नमुने पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली!

म्युकरमायकोसिसचा कहर, मुंबईत तीन मुलांनी गमावले डोळे, तर मुलीला डायबेटिसची लागण

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.