AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी : आरोग्य मंत्रालय

नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना जरी कोरोनाची लागण झाली, तरी त्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण हे 75-80 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी : आरोग्य मंत्रालय
Lav Agrawal
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 18, 2021 | 7:29 PM
Share

नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाचा वेग (CoronaVirus) काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल (Lav Agrawal) यांच्या माहितीनुसार, 3 मे पासून रिकव्हरी रेट वाढत असून, सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमालीची घटत आहे. 11 जून ते 17 जूनदरम्यान, 513 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. गेल्या 24 तासात देशात 62,480 नवे रुग्ण सापडले. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 11 दिवसांपासून रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी दिसत आहे. (Vaccines Cut Hospitalisation Risk by 80%, Give 94% Protection Against Covid-19, Health Ministry)

दरम्यान, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना जरी कोरोनाची लागण झाली, तरी त्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण हे 75-80 टक्क्यांपेक्षा कमी आहे. नव्या अभ्यासात हे समोर आलं आहे. इतकंच नाही तर लस घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं गरज केवळ 8 टक्के इतकी आहे. तर अशा रुग्णांना ICU मध्ये ठेवण्याचं प्रमाण केवळ 6 टक्के इतकं आहे.

ग्रामीण भागात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांना संसर्ग होण्याचा दर 56 टक्के तर 18 पेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचं प्रमाण 63 टक्के इतकं आहे, अशी माहिती डॉक पॉल यांनी दिली. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असला, तरी त्याचं प्रमाण कमी आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम? 

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हैदोस मांडला. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज असून, लहान मुलांना बाधा होण्याची भीती आहे. त्या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकार नियोजन करत असल्याचं, लव अग्रवाल यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

साबरमती नदीच्या पाण्यातही कोरोना विषाणू आढळला, सर्व नमुने पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली!

म्युकरमायकोसिसचा कहर, मुंबईत तीन मुलांनी गमावले डोळे, तर मुलीला डायबेटिसची लागण

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली