AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अपघात! भरधाव कार तीन वेळा पलटली, ओढ्यात कोसळली, एअरबॅगमुळे वाचले चौघांचे प्राण, औरंगाबादची घटना

बीडहून औरंगाबादकडे येणाऱ्या कारला निपाणीजवळ रात्री एक वाजता भीषण अपघात झाला. मात्र कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावला होता आणि ऐनवेळी कारमधील एअरबॅग उघडल्याने चौघांचेही प्राण वाचले.

भीषण अपघात! भरधाव कार तीन वेळा पलटली, ओढ्यात कोसळली, एअरबॅगमुळे वाचले चौघांचे प्राण, औरंगाबादची घटना
सीटबेल्ट अन् एअरबॅगमुळे कारमधील चौघांचेही प्राण वाचले.
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 11:25 AM
Share

औरंगाबादः भरधाव वेगानं येणारी कार वळणावर अचानक ब्रेक दाबल्यानं तीन वेळा पलटली (Car Accident). रस्त्याच्या खाली कोसळली. पण सुदैवाने एअरबॅगमुळे कारमधील चौघांचेही प्राण वाचले. कारच्या समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात झाल्याचे कारचालकाने सांगितले. औरंगाबाद जवळील निपाणीजवळ (Nipali Accident) ही घटना घडली.

निपाणीजवळ रात्री एक वाजता घटना

शहरातील उल्कानगरी येथील केटरिंग व्यावसायिक आनंद मुथा, त्यांचे वडील, कुक जगदीशकुमार आणि मुलाराम प्रजापती हे 21 नोव्हेंबर रोजी सकाळी लग्नकार्यासाठी कारने बीडला गेले होते. लग्न आटोपल्यानंतर रात्री ते औरंगाबादकडे निघाले. रात्री एक वाजेच्या सुमारास ते निपाणी आडगाव येथे आले. शहराकडे येत असताना एका वळणावर समोरील वाहनचालकाने अचानक ब्रेक लावला. अपघात टाळण्यासाठी आनंद यांनी डाव्या बाजूला गाडी वळवली. त्यामुळे कारवरील ताबा सुटला. गाडी दोन ते तीन वेळा उलटून रस्त्याच्या खाली असलेल्या ओढ्यात कोसळली. हा अपघात अत्यंत भीषण होता. परंतु कारच्या समोरच्या बाजूला असलेल्या दोन्ही एअरबॅग उघडल्या. त्यामुळे गाडी चालवणारे आनंद, त्यांच्या शेजारी बसलेले वडील अजय यांना काही वेळ काय घडले हे कळलेच नाही.

एअरबॅग, सीटबेल्टमुळे वाचले प्राण

सध्या बहुतांश कारमध्ये एअरबॅग असतात. पण त्या कधी अॅक्टिव्ह होतात, हे अनेक वाहनधारकांना माहिती नसते. सदर अपघातात आनंद आणि अजय मुथा यांनी सीटबेल्ट लावलेले होते. त्यामुळे हा अपघात झाला तेव्हा दोन्ही एअरबॅग उघडल्याने दुखापत झाली नाही. त्यांच्यासोबत मागे बसलेल्या दोघांना किरकोळ दुखापत झाली. काही वेळानंतर ते गाडीतून कसेबसे बाहेर पडले. वाळूजमधील मित्राला फोन करून सदर अपघाताची कल्पना दिली. मित्रांनी त्यांना लगेच घाटीत आणले. डॉक्टरांनी चौघांची तपासणी करून त्यांना घगरी पाठवले.

इतर बातम्या-

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल : शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का, सहकारमंत्र्यांची बाजी

भंडारा शहराचा जीव गुदमरतोय, ‘भाऊ’गर्दी वाढली, चौकाचौकात शुभेच्छा फलकांचा भडीमार

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.