AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन

शेतकऱ्यांना येत्या दिवाळीपर्यंत आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. (Agriculture Minister Dada Bhuse on Onion auction closed)

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन
| Updated on: Oct 27, 2020 | 2:27 PM
Share

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी थांबवल्यामुळे चिंता व्यक्ती केली आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी याबाबत अनेक मुद्दे मांडले आहेत. केंद्र सरकारने साठवणुकीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या दिवाळीपर्यंत आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. (Agriculture Minister Dada Bhuse on Onion auction closed)

“देशात 60 टक्के कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रात होते. जवळपास देशात 80 टक्के कांद्याची निर्यात ही महाराष्ट्रातून होते. मात्र एक व्यापारी 25 टन कांदा ठेऊ शकतो असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यात विरोधाभास आहे. ग्राउंडवर जी परिस्थिती आहे त्यानुसार केंद्र सरकारने घ्यायला हवा. शेवटी नुकसान हे शेतकरी बांधवांच होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साठवणुकीची मर्यादा वाढवावी,” अशी विनंती दादा भुसेंनी केंद्राला केली आहे.

“त्याशिवाय हा सर्व विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानावर घालू,” असेही दादा भूसे म्हणाले. तसेच नाशिक जिल्ह्यातील व्यापारांसोबत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी हे सर्व मुद्दे मांडले आहेत. ते सर्व मुद्देही मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे, असेही दादा भूसेंनी सांगितले.

“त्याशिवाय येत्या दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत दिली जाईल. गेल्या आठवडयात झालेल्या पावसाचे नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. याबाबत पुढच्या केबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल,” असेही दादा भूसेंनी सांगितले. (Agriculture Minister Dada Bhuse on Onion auction closed)

संबंधित बातम्या : 

सलग दुसऱ्या दिवशी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद, शेतकरी चिंताक्रांत

उस्मानाबाद तालुक्यात फळबागांचे शून्य टक्के नुकसान, जिल्हा प्रशासनाचा अजब पंचनामा

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.