AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली

अक्कलकोट-महाड एसटी बसला बुधवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास आंबेनळी घाटात अपघात झाला.

आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली
| Updated on: Oct 31, 2019 | 10:25 AM
Share

रायगड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात पुन्हा एकदा बस कोसळून भीषण अपघात (Ambenali Ghat Bus Accident) झाला आहे. या अपघातामध्ये बसमधील 58 प्रवाशांपैकी 27 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वर्षभरापूर्वी आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

आंबेनळी घाटातील दरीत एसटी बस कोसळून 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सात जखमींना महाडला हलवण्यात आलं आहे.

अक्कलकोट-महाड (एमएच 20 बीएल 3236) या गाडीला काल (बुधवारी) रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास अपघात झाला. पायटे गावाजवळ समोरुन येणाऱ्या गाडीला साईड देताना एसटी बस 200 फूट खोल दरीला असलेल्या एका संरक्षण कठड्यावर धडकली.

ही धडक इतकी जबरदस्त होती, की कठडा तुटून बस जवळपास 30 फुटांपर्यंत खाली घसरली. मात्र झाडीत अडकल्यामुळे सुदैवाने बस थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

बसमध्ये वाहक, चालक यांच्यासह एकूण 58 प्रवासी असल्याची माहिती आहे. अपघात झाल्याची माहिती समजताच दीड किलोमीटरवर असलेल्या पायटेवाडीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बसमधून बाहेर काढलं.

‘त्या’ अपघाताच्या आठवणी ताज्या

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी पावसाळी सहलीनिमित्त महाबळेश्वरला निघाले होते. त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळून (Ambenali Ghat Bus Accident) 31 पैकी 30 जण जागीच मृत्युमुखी पडले होते.

सहलीसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही बस महाबळेश्वरच्या दिशेने जात होती. साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली. या अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. बसमधील 31 पैकी 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रकाश सावंत देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले.

प्रकाश सावंत देसाई हे खोल दरीतून वर आले आणि त्यांनी मोबाइलवरुन विद्यापीठातील अधिकाऱ्यांना बस अपघाताची माहिती दिली. त्यानंतर देसाईच अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप बहुसंख्य मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

संबंधित बातम्या  

आंबेनळी घाट दुर्घटनेप्रकरणी पहिला गुन्हा दाखल  

अंबेनळी बस अपघात : प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्यासाठी दापोलीकर आक्रमक  

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...