AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनतेनं एनडीएला दिलेलं समर्थन अद्भुत, देशाची दिशाभूल करणाऱ्यांना धडा मिळाला : अमित शाह

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली (Amit Shah on Bihar Assembly Election Result 2020).

जनतेनं एनडीएला दिलेलं समर्थन अद्भुत, देशाची दिशाभूल करणाऱ्यांना धडा मिळाला : अमित शाह
Kolkata: Union Home Minister Amit Shah addresses a press meet, in Kolkata, Friday, Nov. 6, 2020. (PTI Photo/Ashok Bhaumik)(PTI06-11-2020_000224B)
| Updated on: Nov 11, 2020 | 1:10 AM
Share

नवी दिल्ली : “जनतेने नरेंद्र मोदी आणि एनडीएला दिलेलं समर्थन अद्भूत आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि युवकांचा विश्वास दिसून आलाच, त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटवर दिली आहे (Amit Shah on Bihar Assembly Election Result 2020).

“बिहारच्या प्रत्येक वर्गाने जातीवाद करणाऱ्यांना नाकारुन एनडीएचा विकासाचा झेंडा फडकवला. ही प्रत्येक बिहारी नागरिकाच्या आशा आणि आकांक्षीची जीत आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या डबल इंजन विकासची जीत आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन”, असं अमित शाह म्हणाले (Amit Shah on Bihar Assembly Election Result 2020).

“बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासनाची पुन्हा निवड केल्याबद्दल मी बिहारच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषत: युवा पिढी आणि महिलांनी बिहारच्या सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्याची निवड करुन एनडीएचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केलं”, असंदेखील अमित शाह म्हणाले.

बिहारच्या जनतेचं पंतप्रधान मोदींकडून आभार

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देखील ट्विटरवर जनतेचे आभार मानले आहेत. “बिहारच्या युवा पिढीने सिद्ध केलंय की, नवं दशक हे बिहारचं असेल. बिहारच्या युवकांनी एनडीएच्या संकल्पावर विश्वास ठेवला आहे. या युवा ऊर्जामुळे एनडीएला आणखी परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे”, असं मोदी म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या : Bihar Election Result : बिहारमध्ये एमआयएम किंगमेकर ठरणार? 4 जागांवर विजय, तर एका ठिकाणी आघाडीवर

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.