अभिनव कश्यपवर कायदेशीर कारवाई करणार, सलमानवरील आरोपांनंतर अरबाजचा इशारा

अभिनव कश्यप हे सगळं का बोलला माहित नाही. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर पावलं उचलली आहेत, असं अरबाज खानने सांगितलं.

अभिनव कश्यपवर कायदेशीर कारवाई करणार, सलमानवरील आरोपांनंतर अरबाजचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 4:59 PM

मुंबई : दिग्दर्शक अरबाज खानने दिग्दर्शक (Arbaaz Khan Reaction On Abhinav Kashyaps Allegations) अभिनव कश्यपने सलमान खान आणि खान कुटुंबावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “अभिनव कश्यप हे सगळं का बोलला माहित नाही. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर पावलं उचलली आहेत”, असं अरबाज खानने सांगितलं (Arbaaz Khan Reaction On Abhinav Kashyaps Allegations).

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचे अनेक रहस्य उघड होऊ लागले आहे. बॉलिवूडमधील आतल्या गोष्टी आता पुढे येऊ लागल्या आहेत. दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी यशराज फिल्म्स, सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. तसेच, सलमान खानने त्याच्या भावांसाठी माझं करिअर उद्ध्वस्त केलं, असाही आरोप अभिनव कश्यप यांनी केला. मात्र, दिग्दर्शक अरबाज खानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

“दोन वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद झालेला नाही. ‘दंबग-2’ वर आम्ही काम करणार होतो पण काही जुळलं नाही म्हणून आम्ही व्यावसायिकरित्या वेगळे झालो. अभिनव कश्यप हे सगळं का बोलला माहित नाही. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर पावलं उचलली आहेत. त्याने पोस्ट टाकताच आम्ही कायदेशीर पावलं उचलली असून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे”, अशी माहिती अरबाज खानेने दिली.

अभिनवला काय बरळायचं आहे ते बरळू द्या, सलीम खान यांचा अभिनवला टोला 

“अभिनवला काय बरळायचं आहे ते बरळू द्या, तो काय बोलला यावर माझी प्रतिक्रिया देऊन मी अजिबात माझा वेळ फुकट घालवणार नाही”, असा टोला सलीम खान यांनी अभिनव कश्यप यांना लगावला आहे.

Arbaaz Khan Reaction On Abhinav Kashyaps Allegations

नेमकं प्रकरण काय?

दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने सुशांत सिंगच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्याने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट करुन आपली भूमिका मांडली. यात त्याने सलमान खान, खान कुटुंब आणि यशराज फिल्म्सवरही गंभीर आरोप लावले. “यशराज फिल्म टॅलेन्ट मॅनेजमेंट एजन्सीने सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात भूमिका केलेली असावी. मात्र, हा तपासाचा विषय आहे. हे लोक कुणाचंही करिअर बनवत नाही, तर ते लोकांचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करतात”, असा आरोप अभिनव कश्यप यांनी केला होता.

‘सलमान खानने त्याच्या भावांसाठी माझं करिअर उद्ध्वस्त केलं’

अभिनव कश्यप म्हणाला, “सलमान खानने अरबाज खान आणि सोहेल खानच्या प्रेमापोटी माझं करिअर उध्द्वस्त केलं. दबंग सिनेमानंतर त्याने माझ्यासोबत विश्वासघात केला. सलमानने दबंग 2 चं दिग्दर्शन माझ्याऐवजी अरबाज खानकडे दिलं. त्यानंतर सोहेल आणि अरबाज सातत्याने मला धमक्या देत आले. माझा पुढचा सिनेमा बेशरमला वितरक मिळणार नाही यासाठीही सलमानने फिल्डिंग लावली. मात्र, मी शेवटी जीवावर उदार होऊन रिलायन्ससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली. खान कुटुंबीयांनी मला खूप मनस्ताप दिला आहे.”

बॉलिवूडमध्ये कास्टिंग एजन्सी आणि कास्टिंग डिरेक्टरचं खूप मोठं जाळं आहे. सगळा चित्रपट व्यवसाय कमिशनवर चालतो. आऊटसायडरसाठी हे धोकादायक आहे. कलाकारांचा आत्मविश्वास संपवण्यासाठी हे लोक काम करतात, असाही आरोप त्यांनी केला.

Arbaaz Khan Reaction On Abhinav Kashyaps Allegations

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.