AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता? स्वच्छता सर्वेक्षणात राज्यात औरंगाबादचा 6 वा नंबर, देशात 22 वे स्थान!

स्वच्छ अभियानाच्या अंतर्गत सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा राज्यात सहावा क्रमांक लागला असून देशात शहराचे स्थान 22 व्या स्थानी आहे. तरीही शहरातील अनेक स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत, अशी प्रतिक्रिया मनपा प्रसासकांनी व्यक्त केली.

काय सांगता? स्वच्छता सर्वेक्षणात राज्यात औरंगाबादचा 6 वा नंबर, देशात 22 वे स्थान!
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 21, 2021 | 11:38 AM
Share

औरंगाबादः केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ (Swaccha Bharat Abhiyaan)मध्ये औरंगाबाद शहराने (Aurangabad City) राज्यात चक्क सहावा क्रमांक पटकावला आहे. तर देशातील शहरांच्या यादीत 22 वा क्रमांक मिळवला. गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहराने देशातील ‘टॉप 10’ मध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. मागील वर्षी शहर देशपातळीवर 88 व्या स्थानावर होते तर राज्यात 26 व्या स्थानी होते. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी शहराने ही गरूडझेप घेतल्याचे दिसून आल्याने तसेच शहरातील कचऱ्याचे अनेक प्रश्नही अनुत्तरीत असल्याने या निकालाबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘स्वच्छ औरंगाबाद’वर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त

औरंगाबादमध्ये रोज तयार होणाऱ्या 400 टन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी तीन केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र शहरात फक्त दोनच केंद्र सुरु आहेत. नारेगाव, पडेगाव, चिकलठाण्यात कचऱ्याचे डोंगर कायम आहेत. पडेगाव डेपोलगतच्या नागरिकांची दुर्गंधीबाबत तक्रार आहे. त्यामुळे पावसाळ्यात चिकलठाणा कचरा डेपोतील लिचड शेतात येते. तसेच शहरातील अजूनही बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले असतात, उघड्या नाल्यांमुळे दुर्गंधी पसरलेली असते. तरीही शहराचा स्वच्छ शहरांमध्ये औरंगाबादचा नंबर कसा लागला, यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

कसे असते स्वच्छताविषयक सर्वेक्षण?

केंद्र शासन स्वच्छता अभियानाअंतर्गत महापालिकेला सहा हजार गुणांची तपासणी कशी करण्यात येणार, याचा तपशील संबंधित शहरांना  पाठवण्यात  येतो. यात तीन प्रकारे निकष लावले जातात.  पहिल्या प्रकारात महापालिकेने केलेल्या कामांचे कागदोपत्री रेकॉर्ड कितपत अपडेट ठेवले आहे, हे पाहिले जाते. दुसऱ्या प्रकारात थेट केंद्रिय पथकाकडून शौचालये, बाजारपेठ, नागरी वसाहतीची पाहणी करण्यात येते. तिसऱ्या प्रकारात मनपाकडून देण्यात येमाऱ्या सोयी-सुविधांच्या बाबतीत नागरिकांमध्ये किती जागृती केली आहे, हे तपासण्यात येते. औरंगाबाद शहराला राज्य पातळीवर 3 हजार 170 तर राष्ट्रीय पातळीवर 2 हजार 72 गुण मिळाले.

अजून मोठा पल्ला गाठायचाय- मनपा प्रशासक

देशातील ‘टॉप टेन’ च्या यादीत शहराचे नाव येण्यासाठी अजून खूप प्रयत्न करावे लागतील, अशी प्रतिक्रिया मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केली. शहरातील नागरिक, मनपा कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्यामुळे सध्याचे यश मिळवणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या-

आमचं सरकार होत तेव्हाही विलिनीकरण कुठे झालं..? रोडवर एक आणि आत गेल्यावर वेगळं असतं, जनतेनं हुशार व्हावं : महादेव जानकर

Nashik: दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 2 मुले रक्तबंबाळ, उपचार सुरू

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र