औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर, चंद्रकांत खैरेंची माहिती

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असं शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं

औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर, चंद्रकांत खैरेंची माहिती
Follow us
| Updated on: Feb 14, 2020 | 3:28 PM

औरंगाबाद : औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेलं औरंगाबादचं नामांतर अखेर प्रत्यक्षात (Aurangabad to be Renamed as Sambhajinagar) येणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कागदपत्रं मागवून घेतली आहेत. औरंगाबादच्या जनतेला थोड्याच दिवसात सुखद धक्का देणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

‘लोकसभा, विधानसभेत आम्ही ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करतो. अटल बिहारी वाजपेयींपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यत सगळ्यांकडे ही मागणी मी लावून धरली होती. विधानसभेतही प्रश्न मांडले होते. चार वेळा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केले’ असं खैरेंनी ‘टीव्ही9’ला सांगितलं.

संभाजीनगरच्या मुद्द्यावर महापालिका निवडणूक जिंकू शकतो, असं वाटल्यामुळे मनसेने ही भूमिका उचलून धरली. परंतु सर्वांना माहित आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ नाव ठेवलं होतं. त्यामुळे त्याचं क्रेडीट कोणीही घेऊ नये, असंही चंद्रकांत खैरे यांनी सुनावलं

मुख्यमंत्री झाल्यावर लगेच उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. दोन महिन्यांपासून कायदेशीर बाबी सुरु आहेत. लवकरच तुम्हाला औरंगाबादचं नामांतर झाल्याचं समजेल. हे शहर शिवसेनेचं आहे. 1990 मध्ये मी पहिला हिंदू आमदार झालो, तेव्हापासून एकदाही दंगल होऊ दिली नाही, असंही खैरे म्हणाले.

मनसेची उडी

‘औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आमदार राजू पाटील विधानसभेत तसा प्रस्ताव मांडतील’, अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली होती. हिंदूत्ववादी भूमिकेकडे झुकलेल्या मनसेने शिवसेनेची भूमिकाही हायजॅक करण्याच्या हालचाली सुरु केल्याचं दिसत आहे.

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं, ही मागणी शिवसेनेने जवळपास 30 वर्षांपासून उचलून धरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नामांतराचं स्वप्न पाहिलं होतं. आता भाजपनेही या मागणीवर जोर दिला आहे.

मनसेनेही आता औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये उतरण्याचं ठरवलं आहे. 50 हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असलेली मनसे संभाजीनगरचा मुद्दा (Aurangabad to be Renamed as Sambhajinagar) उचलून धरण्याची चिन्हं आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.