AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवनावश्यक वस्तूंची दुकान 24 तास सुरु, लोक फिरायला निघत असतील, तर ही सोय बंद करु : मुख्यमंत्री

मुंबईत साथ फैलावून आणखी दुषित क्षेत्र निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे," असेही उद्धव ठाकरे (Cm Uddhav thakceray Mumbai Corona) म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंची दुकान 24 तास सुरु, लोक फिरायला निघत असतील, तर ही सोय बंद करु : मुख्यमंत्री
| Updated on: Mar 31, 2020 | 4:45 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर पोहोचला (Cm Uddhav Thackeray Mumbai Corona) आहे. यात मुंबईत सर्वाधिक 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत दाट लोकवस्ती, लोकसंख्या यामुळे कोरोनाच प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

“आपण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने २४ तास सुरु (Cm Uddhav Thackeray Mumbai Corona) ठेवली. मात्र, याचा गैरफायदा घेऊन लोक फिरायला निघाल्यासारखे निघत आहेत. जर असे झाले तर ही सोय देखील बंद करण्याचा कठोर निर्णय प्रसंगी घ्यावा लागेल,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

“मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर आणि आर्थिक राजधानी. याठिकाणी कोरोना विषाणूंच्या फैलावावर कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण राहिले पाहिजे. त्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पाऊले उचला. शहरातील 227 प्रभागांमधील घराघरांमध्ये आजपासून भरारी पथकांमार्फत तपासणी करा,” असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

“वरळी कोळीवाड्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडा परिसर दुषित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तेथील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. या घटनेनंतर अशाचप्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दुषित क्षेत्र निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“तसेच 12 ते 23 मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती अधिक बारकाईने तपासा. त्यांना क्वारंटाईन कसे करता येईल ते पहा. अद्यापही काही व्यक्ती सापडू शकलेल्या नसतील त्यांना कोणत्याही परिस्थितीत शोधा. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्या,” असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

“आपापल्या वॉर्डमधल्या खासगी डॉक्टर्सना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरु करण्याची विनंती करा. त्यांना आवश्यक ते मास्क वगैरे द्या, पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल,” असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

“वस्त्यांमधील स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील. त्याठिकाणी आवश्यक फवारणी होत राहील. हात धुवायला साबण राहतील, या गोष्टींकडे लक्ष द्या. वस्त्यांमध्ये साथीचा आजार पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राहिलीच पाहिजे,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 20 ते 40 वयोगटातील रुग्ण आहे. परंतु, खऱ्या अर्थाने वृद्ध नागरिकांना जीवाचा धोका आहे. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. ही साथ ज्येष्ठ नागरिक वयोगटात पसरली तर नियंत्रणासाठी खूप प्रयत्न करावे लागतील,” असेही ते यावेळी (Cm Uddhav Thackeray Mumbai Corona) म्हणाले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.