AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच ‘तेरे नाम’चा सीक्वल, सलमानच्या जागी कोण?

मुंबई : सलमान खानच्या सुपर हिट चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांना रडवले होते आणि सलमानच्या हेअर स्टाईलनेही वेड लावलं होते. तेरे नाम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. मात्र आता तेरे नाम या चित्रपटाचा आता सीक्वल येत आहे. ‘तेरे नाम’चा सीक्वल येत असल्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये या […]

लवकरच 'तेरे नाम'चा सीक्वल, सलमानच्या जागी कोण?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

मुंबई : सलमान खानच्या सुपर हिट चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांना रडवले होते आणि सलमानच्या हेअर स्टाईलनेही वेड लावलं होते. तेरे नाम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. मात्र आता तेरे नाम या चित्रपटाचा आता सीक्वल येत आहे.

‘तेरे नाम’चा सीक्वल येत असल्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये या सीक्वलबद्दल उत्सुकता वाढली आहे. जुन्या चित्रपटापेक्षाही नवीन चित्रपट हा दमदार असेल असं म्हटलं जात आहे. हा चित्रपट तयार करण्याची जबाबदारी अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी घेतली आहे. नवीन चित्रपटातील कथा ही एका गँगस्टारच्या जीवानवर आधारित आहे.

“आता फक्त स्क्रिप्ट तयार झाली आहे. चित्रपटामध्ये एका गँगस्टारची प्रेम कथा दाखवली जाणार आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी अजून अभिनेता निवडीवर चर्चा झाली नाही”, असं सतीश कौशिक म्हणाले.

तेरे नाम चित्रपटाचे दिग्दर्शनही सतीश कौशिक यांनी केले होते आणि या चित्रपटाची स्क्रिप्ट जैनेंद्र यांनी लिहली होती. सलमानच्या व्यतिरिक्त या चित्रपटात भूमिका चावलाने प्रमुख भूमिकेत काम केले होते. तसेच या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.