AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा

भारतात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केला आहे (Corona Community spread in India claim IMA).

Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा
| Updated on: Jul 19, 2020 | 11:59 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 10 लाखाच्या पलिकडे गेला आहे. त्यातच आता भारताची काळजी वाढवणारी माहिती समोर येत आहे. भारतात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केला आहे (Corona Community spread in India claim IMA). त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना संसर्गाची स्थिती अधिक गंभीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुह संसर्गाच्या स्थितीत संसर्ग झालेल्या व्यक्तीला कुणाकडून आणि कोठे संसर्ग झाला याचा तपास करणे अशक्य होते आणि त्यामुळे संसर्गाचा वेगही वाढतो.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आयएमएचे प्रमुख व्ही. के. मोंगा यांनी म्हटलं, “भारतात कोरोना आता धोकादायक वेगाने वाढत आहे. दररोज जवळपास 30 हजार रुग्णांची नोंद होत आहे. भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोना संसर्ग आता भारताच्या अगदी ग्रामीण भागातही पोहचला आहे. हे भारतासाठी चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावरुन समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कोरोनाच्या नव्या हॉटस्पॉटचा धोका वाढला

मोंगा म्हणाले, “दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना संसर्गाला अद्याप नियंत्रणात केले जात आहे. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेशच्या अंतर्गत भागातही नवे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजे.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मागील 3 दिवसांपासून दररोज 30 हजार कोरोना रुग्णांची वाढ

भारतात मागील सलग 3 दिवसांपासून दररोज कोरोना संसर्ग झालेल्या 30,000 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. यासोबतच एकूण कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 77 हजार 618 पर्यंत पोहचली आहे. यात 26 हजार 16 कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 6 लाख 77 हजार 423 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्तही झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 73 हजार 379 कोरोना सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू

Corona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

Corona Vaccine | कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी हॅकिंग, रिसर्च लॅब अलर्टवर

Corona Community spread in India claim IMA

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.