AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर COVID19 चा उल्लेख नसेल, कृषी मंत्री दादा भुसे यांची ग्वाही

कृषी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणपत्रिका कोव्हिड 19 असा उल्लेख नसेल, असं दादा भुसे यांनी सांगितलं. Dada Bhuse on covid19 Marksheet

कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर COVID19 चा उल्लेख नसेल, कृषी मंत्री दादा भुसे यांची ग्वाही
agricultural minister dada bhuse
| Updated on: Jul 14, 2020 | 12:53 PM
Share

मुंबई : कृषी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणपत्रिका किंवा सर्टिफिकेटवर कोव्हिड 19 असा उल्लेख नसेल, अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. कोरोना काळात परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे निकाल दिला जात आहे. मात्र या गुणपत्रिकांवर कोव्हिड 19 असा उल्लेख नको, या मागणीचा आग्रह भाजपकडून केला जात आहे. माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार हा मुद्दा लावून धरला आहे. (Dada Bhuse on covid19 Marksheet)

त्याबाबत स्पष्टीकरण देताना कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, “कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोव्हिड 19 असा उल्लेख नसेल. आधीच्या सत्रातील परीक्षांचे गुण आणि शेवटच्या वर्षाचे 50 टक्के गुण या सूत्रानुसार निकाल जाहीर करण्यात येईल. मात्र त्यावर कोव्हिडबाबत कोणताही उल्लेख नसेल. हे निकाल जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर होतील. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही”

आशिष शेलार यांचं ट्वीट

दरम्यान, भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत ट्वीट करुन सरकारवर निशाणा साधला. “कृषी विद्यापीठातील गुणपत्रिकेवर “प्रमोटेड कोविड-19” असा शिक्का असल्याचे आता समोर आलेय. ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आम्ही सूचना केल्या की सरकारच्या अंगाला सुया टोचतात..विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही हेच सांगत होतो एवढे दिवस! “ढ” कारभार सगळा!” असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं.

परीक्षा रद्द

राज्यातील कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन आणि गेल्या दोन वर्षातील गुणांची सरासरीनुसार उत्तीर्ण केलं जाणार आहे. राज्यातील 230 कृषी विद्यालयातील दहा हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन आणि तीन वर्ष कालावधीच्या पदविकाच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात अपेक्षित होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

(Dada Bhuse on covid19 Marksheet)

संबंधित बातम्या 

वाईन शॉपची तुलना विद्यापीठांशी कशाला? परीक्षा घेऊ शकत नाही, ठाकरे सरकारची रोखठोक भूमिका 

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....