AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन राजस्थानकडे जाणारे जवळपास 4 ते 5 हजार कामगार अडकले (Many Worker Traveled Rajasthan) आहेत.

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास
| Updated on: Mar 28, 2020 | 12:08 AM
Share

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा (Many Worker Traveled Rajasthan) केली. पण यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामन्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय, राजस्थानमधील कामगार वर्ग मुलाबाळांसह गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. लॉक डाऊनपूर्वी अनेक नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केलं होतं. त्यामुळे अनेक कामगार वर्ग स्वत: च्या गावी जाण्यासाठी निघाला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Many Worker Traveled Rajasthan) राज्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन राजस्थानकडे जाणारे जवळपास 4 ते 5 हजार कामगार अडकले आहेत. यातील अनेक कामगार मुंबई, कल्याण, पुणे आणि आसपासच्या परिसरातून 100 ते 200 किलोमीटरची पायपीट करत आले आहेत.

मात्र गुजरातच्या सीमा पूर्णत: बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधून गुजरात मार्गे जाणाऱ्या कुणालाही सोडले जात नाही. यामुळे हे सर्व कामगार सीमेवरच अडकून पडले आहेत.

यावेळी प्रशासनाकडून कामगारांना पुन्हा महाराष्ट्रात ज्या ठिकाणावरुन आले आहे. त्या ठिकाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. पण या कामगारांनी परत जाण्यासाठी नकार दर्शवला आहे. या कामगारांची संख्या पाहता पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाकडून समोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

काही तहसीलदारांकडून अडकलेल्या कामगारांना लाऊड स्पीकरद्वारे परतण्याचे आवाहन करत शांतता राखण्याचे आणि कायदा पाळण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र तरीही हे कामगार एकत नाही. पण पालघर पोलीस अधीक्षक आल्यानंतर त्यांना राजस्थानमधील कामगारांना कुटुंबासह हलवले आहे. या सर्वांना मिळेल त्या वाहनाने महाराष्ट्रात काम करत असलेल्या स्थळी सोडण्यात आले (Many Worker Traveled Rajasthan) आहे.

Follow Us
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.