AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन राजस्थानकडे जाणारे जवळपास 4 ते 5 हजार कामगार अडकले (Many Worker Traveled Rajasthan) आहेत.

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास
| Updated on: Mar 28, 2020 | 12:08 AM
Share

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा (Many Worker Traveled Rajasthan) केली. पण यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामन्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय, राजस्थानमधील कामगार वर्ग मुलाबाळांसह गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. लॉक डाऊनपूर्वी अनेक नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केलं होतं. त्यामुळे अनेक कामगार वर्ग स्वत: च्या गावी जाण्यासाठी निघाला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Many Worker Traveled Rajasthan) राज्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन राजस्थानकडे जाणारे जवळपास 4 ते 5 हजार कामगार अडकले आहेत. यातील अनेक कामगार मुंबई, कल्याण, पुणे आणि आसपासच्या परिसरातून 100 ते 200 किलोमीटरची पायपीट करत आले आहेत.

मात्र गुजरातच्या सीमा पूर्णत: बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधून गुजरात मार्गे जाणाऱ्या कुणालाही सोडले जात नाही. यामुळे हे सर्व कामगार सीमेवरच अडकून पडले आहेत.

यावेळी प्रशासनाकडून कामगारांना पुन्हा महाराष्ट्रात ज्या ठिकाणावरुन आले आहे. त्या ठिकाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. पण या कामगारांनी परत जाण्यासाठी नकार दर्शवला आहे. या कामगारांची संख्या पाहता पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाकडून समोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

काही तहसीलदारांकडून अडकलेल्या कामगारांना लाऊड स्पीकरद्वारे परतण्याचे आवाहन करत शांतता राखण्याचे आणि कायदा पाळण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र तरीही हे कामगार एकत नाही. पण पालघर पोलीस अधीक्षक आल्यानंतर त्यांना राजस्थानमधील कामगारांना कुटुंबासह हलवले आहे. या सर्वांना मिळेल त्या वाहनाने महाराष्ट्रात काम करत असलेल्या स्थळी सोडण्यात आले (Many Worker Traveled Rajasthan) आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...