AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गदर 24 टक्के, चाचण्या वाढवल्याने दिल्लीत 6 टक्क्यांवर, फडणवीसांनी मांडली आकडेमोड

कोरोनाला हरवून बळी रोखण्याचा एकच मार्ग आहे. चाचण्या, शोध आणि उपचार (टेस्ट, ट्रेस, ट्रीट), असा दावा फडणवीसांनी केला आहे.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गदर 24 टक्के, चाचण्या वाढवल्याने दिल्लीत 6 टक्क्यांवर, फडणवीसांनी मांडली आकडेमोड
| Updated on: Jul 22, 2020 | 9:07 AM
Share

मुंबई : “कोरोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमावले आणि काय गमावले?” असा सवाल करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आकडेमोड मांडली आहे. अधिकाधिक चाचण्या हा कोरोना मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय असल्याचे सांगत फडणवीस यांनी ट्वीटद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Devendra Fadnavis asks what we lost and gained by very less COVID19 testing)

“महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा दर सुरुवातीला 6 ते 7 टक्के होता, तो 8 जूनपर्यंत 17 ते 18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 टक्के. म्हणजे 100 चाचण्यांमागे 24 जणांना कोरोनाची लागण” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या ट्वीटमध्ये फडणवीसांनी महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण, पॉझिटिव्ह रुग्ण, रुग्णांची टक्केवारी आणि कोरोनाबळींची आकडेवारी जोडली आहे.

“मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अद्यापही अतिशय कमी आहे. 1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी दररोज केवळ 5500 चाचण्या. महाराष्ट्र आणि मुंबईतील चाचण्यांची संख्या दररोज सरासरी तेवढीच” असे फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत वेळेत हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर काय घडले ते पहा. चाचण्यांची संख्या वेगाने वाढवल्याने संसर्गाचा दर 30 ते 35 टक्क्यांवरुन आता 6 टक्क्यांवर आला आणि कोरोना बळींच्या संख्येतही घसरण. तरीही चाचण्यांची संख्या दररोज कायम ठेवली आहे” असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा : “ही राजकीय भेट नाही, सरकार पाडण्यात रस नाही” फडणवीसांची अमित शाहांशी दीड तास चर्चा

“आता तरी जागे व्हा. मी सातत्याने मुंबईत कोव्हिड टेस्टिंग वाढवण्याची विनंती करतोय. कोरोनाला हरवून बळी रोखण्याचा एकच मार्ग आहे. चाचण्या, शोध आणि उपचार (टेस्ट, ट्रेस, ट्रीट)” असा दावा फडणवीसांनी केला आहे.

(Devendra Fadnavis asks what we lost and gained by very less COVID19 testing)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.