AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणी

मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली (Bhaskar Jadhav demand send Konkan people) आहे.

मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणी
| Updated on: Apr 26, 2020 | 7:49 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Bhaskar Jadhav demand send Konkan people)  सुरु आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी न झाल्याने पुन्हा 19 दिवस लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहे. कोकणातील अनेक चाकरमानी हे मुंबईत काम करतात. मात्र लॉकडाऊनमुळे ते त्या ठिकाणी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद (Bhaskar Jadhav demand send Konkan people) आहे. या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. मात्र माझ्या रोजीरोटीनिमित्त मुंबईत गेलेल्या कोकणातील चाकरमान्यांना कोकणात परतण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक कामाच्या निमित्ताने येतात. मुंबई काम करणाऱ्यांमध्ये कोकणातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कोकणातील लोकांना कोकणात येऊ द्या, असे मी मुंबईत ही परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी सांगितले आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.

कोकणातील गावांमध्ये त्यांची घरे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येईल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणातील चाकरमान्यांना कोकणात परतण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली आहे.

संबंधित बातम्या : 

NIA कोठडीत आनंद तेलतुंबडेंचा कोरोनाबाधिताशी संपर्क, 14 दिवस क्वारंटाईन

कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, 40 प्रयोगशाळांच्या मदतीने 1 लाखाचा टप्पा पार

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.