AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना दुष्काळी पथकाकडून पाहणी, ना भेट, शेतकरी दाम्पत्य 10 तास ताटकळत

सोलापूर: दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकांसाठी शेतकरी दाम्पंत्याला 10 तास ताटकळत ठेवले. केंद्राचे आलेले पथक तुमच्या शेताची पाहणी करणार आहे, तुमच्याशी बोलणार आहेत, असे सांगून शेतातच बसवून ठेवलेल्या शेतकऱ्याला न भेटताच पथक दुसऱ्याच रस्त्याने निघून गेले.  अधिकारी येतील, भेटतील आणि दुष्काळी मदत मिळेल, या आशेने बसलेल्या शेतकरी दाम्पत्याचा दहा तास वाट पाहूनही हिरमोड झाला. […]

ना दुष्काळी पथकाकडून पाहणी, ना भेट, शेतकरी दाम्पत्य 10 तास ताटकळत
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

सोलापूर: दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकांसाठी शेतकरी दाम्पंत्याला 10 तास ताटकळत ठेवले. केंद्राचे आलेले पथक तुमच्या शेताची पाहणी करणार आहे, तुमच्याशी बोलणार आहेत, असे सांगून शेतातच बसवून ठेवलेल्या शेतकऱ्याला न भेटताच पथक दुसऱ्याच रस्त्याने निघून गेले.  अधिकारी येतील, भेटतील आणि दुष्काळी मदत मिळेल, या आशेने बसलेल्या शेतकरी दाम्पत्याचा दहा तास वाट पाहूनही हिरमोड झाला. हा सर्वप्रकार 5 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात घडला.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. 5 डिसेंबर रोजी अहमदनगर येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. पथकातील अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी करमाळा तालुक्यातील सालसे येथील आजिनाथ पाटील यांच्या शेतावर जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

आजिनाथ पाटील यांचे शेत निवडण्याचे कारण म्हणजे पाटील यांचे शेत हे करमाळा – कुर्डूवाडी या राज्य महामार्गावर येते. शेत महामार्गावर असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्रास होणार नाही आणि पाहणी देखील उभ्या उभ्या पूर्ण होईल, यामुळेच आजिनाथ पाटील यांच्या शेताची निवड करण्यात आली होती.

आजिनाथ पाटील यांच्या शेतात केंद्राचे पाहणी पथक येणार म्हटल्यावर त्याची माहिती सालसे गावातील सर्वांना कळाली. गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह अनेक जण आजिनाथ पाटील यांच्या वस्तीवर येऊन बसले. गावातील मंडळी तसेच प्रशासनातील अधिकाऱी हे शेतावर आल्यामुळे त्यांना चहापान करण्यातच अलकाबाई पाटील यांचा बराचसा वेळ गेला.

केंद्रीय पथक आता येईल मग येईल म्हणत सकाळी आठपासून वाट पाहत असलेले पाटील दाम्पत्य, रात्री आठवाजेपर्यंत शेतातच होते. पथक येणार आहे कुठे जाऊ नका … आता पथक येणार आहे कुठे जाऊ नका असं म्हणत पाटील यांना कुठेही हलू दिले नाही. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत पथक काही आले नाही आणि शेवटी पाटील दाम्पत्यांची आणि केंद्राच्या दुष्काळी पाहणी पथकाची काही भेट झाली नाही.

अहमदनगरवरुनच पथकाला येण्यास उशीर झाल्यामुळे, जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेलेल्या या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांशी 10 ते 15 मिनिटं संवाद साधला आणि पथक मुक्कामासाठी पंढरपूरकडे निघून गेले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...