पावसामुळे ऐन नवरात्रीत फुलं खराब, विक्री होत नसल्याने फुलं रस्त्यावर फेकण्याची वेळ

परतीच्या पावसाने फुलशेतीला मोठा फटका बसला आहे (Florists throw flowers at Kalyan APMC).

पावसामुळे ऐन नवरात्रीत फुलं खराब, विक्री होत नसल्याने फुलं रस्त्यावर फेकण्याची वेळ
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 4:25 PM

ठाणे : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या फूल बाजारात पावसामुळे फूलं खराब होत आहेत. त्यात फुलांना ग्राहक नसल्याने बाजारात फुलांचा माल सडत आहे. त्यामुळे फूल विक्रेत्यांवर फुलांचा माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे (Florists throw flowers at Kalyan APMC).

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून फूल बाजार बंद होता. त्यावेळी भाजीपाला मार्केट सूरु होते. फूल बाजार अत्यावश्यक सेवेत मोडत नसल्याने फूल बाजार बंद होता. अनलॉकच्या प्रक्रियेत फूल बाजार सुरु झाला. त्यावेळी फूल मार्केटमधील विक्रेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.

नवरात्र आणि दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळतो. मात्र, परतीच्या पावसाने फुलशेतीला मोठा फटका बसला. त्यामुळे फुलांचा माल शेतातच खराब झाला. जे काही चांगली फुलं होती ते बाजारात आले. मात्र पावसामुळे पुन्हा फुलांचा माल सडला (Florists throw flowers at Kalyan APMC).

कोरोना संकटामुळे मंदिरं उघडी झालेली नाहीत. सध्या मंदीरं सजविण्यासाठी भक्त फुलं विकत घेत नाहीत. त्यामुळे बाजारात फुलाला उठाव नाही. जो काही थोडाफार घरगुती हारासाठी हार फूल नेले जात होते, त्यालाही परतीच्या पावसाने फटका बसला आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (19 ऑक्टोबर) फुल मालांच्या 25 गाड्या आल्या. मात्र मालाला उठाव नाही. तसेच पावसामुळे माल भिजल्याने फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ विक्रेत्यांना आली आहे. जवळपास 10 हजार किलो फूलं रस्त्यावर फेकून देण्यात आली आहे. त्यामुळे फूल व्यापाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

हेही वाचा : सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिरता

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.