AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Essential Commodities Act | जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल, कृषिमाल नियंत्रणमुक्त

जीवनावश्यक वस्तूंवरील सरकारी नियंत्रण हटवण्यात आल्याने खाद्यतेल, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अन्नधान्याचा साठा करता येणार आहे. (FM Nirmala Sitharaman announces reforms in Essential Commodities Act relief to farmers)

Essential Commodities Act | जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल, कृषिमाल नियंत्रणमुक्त
| Updated on: May 15, 2020 | 5:35 PM
Share

नवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तू कायद्यात (Essential Commodities Act) बदल करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. शेतकर्‍यांना चांगल्या किमती मिळवून देण्यासाठी या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार धान्य, खाद्यतेल, तेलबिया, डाळी, कांदे आणि बटाटे यांच्यासह कृषी उत्पादने नियंत्रणमुक्त करण्यात येणार आहेत. थोडक्यात, शेतकऱ्यांना कृषिमालाचा साठा करण्यास मुभा मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना दिलासा देणारं वृत्त दिलं. (FM Nirmala Sitharaman announces reforms in Essential Commodities Act relief to farmers)

जीवनावश्यक वस्तूंवरील सरकारी नियंत्रण हटवण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. त्यानुसार खाद्यतेल, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अन्नधान्याचा साठा करता येणार आहे. साठेबाजीबद्दल नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळ अशा अपवादात्मक स्थितीतच विचारणा होणार असून गरज पडली तरच सरकार यात हस्तक्षेप करणार आहे.

शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी पर्याय दिले जाणार आहेत. जिथे चांगला भाव, तिथे शेतमाल विकण्याची मुभा असेल. शेतकऱ्यांना परराज्यातही माल विकता येणार आहे. इतर उत्पादनांवरही मालविक्रीची बंधने नसतील.

जीवनावश्यक वस्तू कायदा कृषी क्षेत्राच्या वाढीस मोठा अडथळा मानला जात असे. कारण कधीही साठेबाजीची मर्यादा लागू होण्याच्या भीतीने व्यापारी अधिक खरेदी करण्यास घाबरत.

काय आहे जीवनावश्यक वस्तू कायदा?

(FM Nirmala Sitharaman announces reforms in Essential Commodities Act relief to farmers)

अत्यावश्यक वस्तूंचा कायदा 1955 च्या अधिनियमानुसार शासनाला अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन, वितरण, व्यापार व वाणिज्य यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश काढता येतात. केंद्र शासनाने तांदूळ, खाद्यतेल व खाद्यतेल बिया तसेच धानाच्या साठामर्यादेवर निर्बंध लागू केले आहेत.

12 फेब्रुवारी 2007 पासून सुधारित यादीप्रमाणे जीवनावश्यक वस्तू

औषधे खते. (रासायनिक, अकार्बनी किंवा मिश्र यापैकी कोणतीही) अन्नसामुग्री (खाद्यतेल, बिया व तेल यांच्यासह) पूर्णतः कापसापासून तयार केलेला धागा. पेट्रोलियम व पेट्रोलजन्य पदार्थ. कच्चा ताग व तागाचे कापड. अन्न पिकांचे बियाणे तण आणि फळे भाजीपाल्याचे बियाणे. गुरांच्या वैरणाचे बियाणे. तागाचे बियाणे सरकी

(FM Nirmala Sitharaman announces reforms in Essential Commodities Act relief to farmers)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.