AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 नद्यांचा गडचिरोलीला वेढा, 100 गावांचा संपर्क तुटला, पावसाचा हाहाकार

गडचिरोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार (Gadchiroli Flood) माजवला आहे. भामरागड (Bhamragad Flood), अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली धानोरा चार्मोशी या सात तालुक्यातील अनेक भागाचा  संपर्क तुटला आहे. 

6 नद्यांचा गडचिरोलीला वेढा, 100 गावांचा संपर्क तुटला, पावसाचा हाहाकार
| Updated on: Sep 06, 2019 | 11:02 AM
Share

Gadchiroli Flood गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार (Gadchiroli Flood) माजवला आहे. भामरागड (Bhamragad Flood), अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली धानोरा चार्मोशी या सात तालुक्यातील अनेक भागाचा  संपर्क तुटला आहे.  भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला असून तीन दिवसापासून पर्लाकोटा पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पर्लकोटा,वैनगंगा,दिना, प्राणहिता, इंद्रवती, गोदावरी, या सहा नद्यांना मोठया प्रमाणात पूर आलेला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सर्व शाळांना आज आणि उघा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नदी नाले ओलांडून नये असे निदर्शने देण्यात आले आहेत.

वैनगंगा नदीला पूर आल्याने आष्टी पूल पाण्याखाली गेला.  त्यामुळे चंद्रपूर-आष्टी- आलापल्ली मार्ग बंद झाला.  भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली या पाच तालुक्यातील अनेक भागाचा  संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यात धुवाँधार पाऊस बरसत आहे.

पावसामुळे कोणकोणते मार्ग बंद?

आलापल्ली – भामरागड मार्ग बंद

बडीया मार्ग बंद

कुरखेडा-वैरागड मार्ग बंद

आरमोरी -वडसा मार्ग बंद

कमलापुर-रेपलपल्ली मार्ग बंद

अहेरी- देवालमरी नाल्याने मार्ग बंद

आलापल्ली- सिरोंचा मार्ग बंद

छिमेला नाल्यावर मोठया प्रमाणात पाणी वाहत असल्याने दोन तासापासून वाहतूक ठप्प. छिमेला नाल्यात मागील वर्षी एस.टी.बस वाहून गेली होती.

VIDEO 

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.