AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात गरिबी मोजण्याचे मापदंड बदलणार?, ‘या’ निकषांवर गरिबी ठरणार

केंद्र सरकार दारिद्र्य रेषेचे निकष बदण्याचा विचार करत असून लवकरच गरीब असण्याची व्याख्या बदलण्याची शक्यता आहे. (government is thinking to prepare new rules for poverty line)

देशात गरिबी मोजण्याचे मापदंड बदलणार?, 'या' निकषांवर गरिबी ठरणार
| Updated on: Oct 19, 2020 | 6:19 PM
Share

दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात देशातील बेरोजगारी वाढलेली असताना केंद्र सरकार दारिद्र्य रेषेची (poverty line) परिभाषा बदलण्याच्या विचारात आहे. यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने (Union Ministry of Rural Development) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार दारिद्र्य रेषेच्या निकषांसोबतच गरिबिची व्याख्या बदलण्याची शक्यता आहे. (government is thinking to prepare new rules for poverty line)

हे असणार गरीब असण्याचे निकष

लोकांचे दारिद्र्य ठरवणारे निकष देशात बलदण्यात येणार आहेत. तशी चर्चा केंद्रीय पातळीवर होत आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने (Union Ministry of Rural Development) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आता नागरिकांचा अधिवास, त्यांचे शिक्षण, परिसरातील स्वच्छता यावरुन कोण गरीब? आणि कोण श्रीमंत? हे ठरणार आहे.

आता 1407 रुपये खर्च न करु शकणारे नागरिक गरीब

रंगराजन समितीने केलेल्या शिफारशीनुसार शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा 1407 रुपये निश्चित करण्याचा विचार केला जातोय. तर ग्रामीण भागासाठी ही सीमा 972 रुपये असणार आहे. म्हणजे शहरात राहणारा नागरिक एक महिन्याला स्वत:वर 1407 रुपये खर्च करु शकत नसेल तर तो गरीब आहे; असे गृहित धरले जाईल. तसेच ग्रामीण भागात स्वत:वर 972 रुपये खर्च न करु शकणारे नागरिक गरीब असतील.

दारिद्र्य रेषा बदलण्याची गरज काय?

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशात, गरिबी तसेच सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतील बदल व्यवस्थित मोजले जात नाहीत. या निकषांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे. त्यामुळे देशातील दारिद्र्य रेषेचे आकलन याेग्य पद्धतीने झालेले नाही. याच कारणामुळे दारिद्र्य रेषेसाठी निकष बदलने गरजेचे आहे.. तसेच देशात गरिबीची व्याख्या फक्त भूक या निकषावरच न ठरवता अर्थव्यवस्थेचा विकास,  संधी या गोष्टींवरही विचार केला जावा; अशी केंद्रीय ग्रामविकास मंंत्रालायची भूमिका आहे.

संबंधित बातम्या  :

Global Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; ‘ग्लोबल हंगर इन्डेक्स’ जाहीर

चीन तैवानवर हल्ला करणार? वाचा ड्रॅगनचा संपूर्ण ‘गेम प्‍लॅन’

चीनमध्ये निसर्गाचं अचंबित करणारं रूप, एकाच वेळी 3 सूर्य दिसल्याने जगभरात चर्चा

(government is thinking to prepare new rules for poverty line)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा