देशातील जवळपास 50 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 48.07 टक्क्यावर

देशाचा कोरोना रिकव्हरी रेट आता 48.07 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली (India Corona Recovery Rate).

देशातील जवळपास 50 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 48.07 टक्क्यावर
Follow us
| Updated on: Jun 02, 2020 | 6:10 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे (India Corona Recovery Rate). देशाचा कोरोना रिकव्हरी रेट आता 48.07 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली (India Corona Recovery Rate).

देशात आतापर्यंत 95 हजार 527 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 708 रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा 15 एप्रिल रोजी कोरोना रिकवरी रेट 11.42 टक्के होता, तो आता 48.07 टक्यांवर पोहोचला आहे, असं लव अग्रवाल म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टेस्टिंगची सुविधा वाढवण्यात आली आहे. देशात दररोज 1 लाख 20 हजारांपेक्षाही जास्ट टेस्ट होतात, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या उंबरठ्यावर

देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. देशात दररोज 7 ते 8 हजार कोरोना रुग्ण आढळतात. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 98 हजार 706 वर पोहोचली आहे. यापैकी 5 हजार 598 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार गेला आहे.

देशाचा कोरोना मृत्यूदर 2.82 टक्के

देशात कोरोना मृत्यूदर 2.82 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर जगभरातील इतर देशांच्या तुलनेने सर्वात कमी मृत्यूदर आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 73 टक्के रुग्णांना मधुमेह, रक्तदाब सारखे इतर आजारदेखील होते.

कोरोना रुग्णांच्या संख्येची तुलना इतर देशांसोबत करणे योग्य नाही. कारण इतर देशांच्या तुलनेने भारताची लोकसंख्या जास्त आहे. आपण तुलना केली तरी लोकसंख्येचा विचार नक्की करावा, असं लव अग्रवाल म्हणाले.

“भारताची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या असलेल्या 14 देशांसोबत तुलना केली तर तेथील परिस्थितीत भारतापेक्षा भयानक आहे. त्या देशांमध्ये भारतापेक्षा 22.5 पटीने जास्त रुग्ण आहेत. तर 55.2 पटीने जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे”, असं लव अग्रवाल म्हणाले.

संबंधित बातम्या :

आरोग्यमंत्र्यांकडून मध्यरात्री 2 पर्यंत खासगी रुग्णालयांची झाडाझडती, मुंबईतील 4 रुग्णालयांना नोटीस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.