पाच राज्यांच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभव काय असतो हे भाजपला क्वचितच पाहायला मिळालं. पण पराभव काय असतो हे भाजपला तेव्हा समजलं, जेव्हा हातातली अत्यंत महत्त्वाची तीन राज्य काँग्रेसने हिसकावून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातील पराभवानंतर जनतेचं कौल स्वीकारत जिंकलेल्या काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. पाचही राज्यातील जनतेचं मोदींनी अभिनंदन केलं. “विजयाबद्दल काँग्रेसचं […]

पाच राज्यांच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभव काय असतो हे भाजपला क्वचितच पाहायला मिळालं. पण पराभव काय असतो हे भाजपला तेव्हा समजलं, जेव्हा हातातली अत्यंत महत्त्वाची तीन राज्य काँग्रेसने हिसकावून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातील पराभवानंतर जनतेचं कौल स्वीकारत जिंकलेल्या काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. पाचही राज्यातील जनतेचं मोदींनी अभिनंदन केलं.

“विजयाबद्दल काँग्रेसचं अभिनंदन. तेलंगणात केसीआर गारु (के. चंद्रशेखर राव) आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा”, असं ट्वीट मोदींनी केलं. पाच राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. अखेर त्यांनी काल रात्री उशिरा ट्वीट केलं.

मोदींनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, “भाजपच्या कुटुंबातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी रात्रंदिवस मेहनत केली. त्यांच्या या मेहनतीला मी सलाम करतो. जय आणि पराजय हा आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आजचा निकाल हा देशाच्या विकासासाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी फायदेशीर ठरेल.”

राहुल गांधींची प्रतिक्रिया

“राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये त्या त्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केले आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मात्र आता बदल झाला आहे. आम्ही त्यांचे काम नव्याने पुढे नेत, या राज्यांना आणखी पुढे नेऊ. शेतकरी, युवा, लघुद्योजक इत्यादी सर्वांना जी आश्वासनं दिलीत, ती प्राधान्याने पूर्ण करु. “, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या, हे आमच्या समोरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील, असंही राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

अंतिम निकाल (राज्यनिहाय आकडेवारी)

राजस्थान (199) :

काँग्रेस – 99 भाजप – 73 इतर – 27

मध्य प्रदेश (230) :

काँग्रेस – 114 भाजप -109 इतर – 07

छत्तीसगड (90) :

काँग्रेस – 68 भाजप – 15 इतर – 07

तेलंगणा (119) :

टीआरएस – 88 काँग्रेस-टीडीपी – 19 भाजप – 01 इतर – 11

मिझोराम (40) :

एमएनएफ – 26 काँग्रेस – 05 भाजप – 01 इतर – 08

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.