AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेलमध्ये कोरोनाचा प्रकोप, वाढत्या कोरोना मृत्यूकडे मनपाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

पनवेलच्या वळवली गावात काही दिवसांच्या अंतराने गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे (Increase in Corona in death in Valavali village Panvel).

पनवेलमध्ये कोरोनाचा प्रकोप, वाढत्या कोरोना मृत्यूकडे मनपाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
प्रातिनिधिक छायाचित्रं
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: | Updated on: Oct 16, 2020 | 8:07 PM
Share

पनवेल : पनवेलच्या वळवली गावात काही दिवसांच्या अंतराने गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे (Increase in Corona in death in Valavali village Panvel). या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यानंतर पनवेल महानगरपालिकेने या परिस्थितीकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत.

सध्या पनवेल तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 472 पर्यंत पोहचली आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना संसर्गाचा प्रकोप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता महापालिका हद्दीतील वळवळी गावातील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. फक्त काही दिवसांच्या अंतराने एका पाठोपाठ होणाऱ्या मृत्यूमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

कोरोनाच्या संकटात अवेळी मृत्यू ओढवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय या कुटुंबातील एका महिलेची तब्येत खराब असून त्या आय.सी.यू. मध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ग्रामीण भागातही वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन, तहसील प्रशासन यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही कोरोनामुळे ग्रामीण भागातील वाढत्या मृत्यूच्या घटनांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असं मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.

पनवेलमध्ये सध्या कोरोनाची संख्या वाढत आहे. महापालिकेने आता या गावात विशेष मोहीम राबवून या ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक झाली आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत या तपासणी करावी, अशी मागणी आता महापालिका नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले. या ठिकाणी अजूनही पालिकेचा कोणताही अधिकारी गेला नसल्याचाही आरोप केला जात आहे.

वळवलीची घटना ही दुखद आहे. मात्र पनवेल महापालिका पूर्णपणे या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत आहे. आम्ही गावामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवले आहे. सर्व गावांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.

हेही वाचा :

पनवेल आरटीओला लॉकडाऊनचा फटका, उत्पन्नात 130 कोटींची घट

महाड दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या पनवेलमधील आणखी 2 इमारती अतिधोकादायक

वडिलांचा कोरोनाने मृत्यू, बातमी कळताच काही तासातच कोरोनाग्रस्त मुलाला हार्ट अटॅक

Increase in Corona in death in Valavali village Panvel

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली