AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिलगिट बाल्टिस्तानला राज्य घोषित करुन 70 वर्षांचा अत्याचार लपवता येणार नाही, भारताचं इम्रान खान यांना उत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तानला राज्याचा दर्जा दिल्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या घोषणेवर भारताने आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे.

गिलगिट बाल्टिस्तानला राज्य घोषित करुन 70 वर्षांचा अत्याचार लपवता येणार नाही, भारताचं इम्रान खान यांना उत्तर
| Updated on: Nov 02, 2020 | 12:11 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तानला राज्याचा दर्जा दिल्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या घोषणेवर भारताने आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा भाग आहे आणि पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या या घोषणेला भारताचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे (India respond to Imran Khan over Atrocities in Gilgit baltistan).

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, “पाकिस्तानकडून जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या भारताच्या भूभागात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारताचा विरोध आहे. केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखसह “गिलगिट-बाल्टिस्तान” 1947 च्या करारानुसार भारताचा अविभाज्य भाग आहे.”

“पाकिस्तानला घुसखोरी करत बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेल्या भागात कोणताही बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानचे हे प्रयत्न पाकिस्तानमधील 7 दशकांच्या मानवाधिकार उल्लंघन आणि बेकायदेशीर ताब्याला लपवू शकणार नाही. तसेच या भागाला भारतापासून वेगळे देखील करु शकत नाही,” असंही अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं.

“पाकिस्तानने भारताच्या भूभागाची स्थिती बदलण्याची मागणी करु नये. उलट आम्ही पाकिस्तानकडे भारताच्या भूभागावर बेकायदेशीर ताबा सोडून तो भाग तात्काळ भारताच्या ताब्यात देण्याची मागणी करतो,” असंही श्रीवास्तव यांनी म्हटलं.

हेही वाचा :

पुढील दिवसांमध्ये कुणाचे पाय थरथर कापतात आणि कुणाला घाम फुटतो हे पाहूच, इम्रान खान यांची दर्पोक्ती

पुलवामा हल्ल्याची पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली, आता काँग्रेसची नेत्यांची बोलती बंद का? राजनाथ सिंहांचा सवाल

‘पुलवामात भारताला घरात घुसून मारलं’, चौफेर कोंडीनंतर पाकिस्तानच्या मंत्र्याचा यू-टर्न

India respond to Imran Khan over Atrocities in Gilgit baltistan

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.