AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुलभूषण जाधव प्रकरण : हरिश साळवेंनी त्यांचं काम केलं, आता मोदींचं काम सुरु

न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे.

कुलभूषण जाधव प्रकरण : हरिश साळवेंनी त्यांचं काम केलं, आता मोदींचं काम सुरु
| Edited By: | Updated on: Jul 17, 2019 | 7:26 PM
Share

हेग, नेदरलँड : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिलाय. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे. या निकालानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

या प्रकरणात भारताचा सर्वात मोठा विजय म्हणजे आता कौन्सिलर एक्सेस मिळणार आहे. म्हणजेच हा खटला पुन्हा चालवला जाईल आणि भारतालाही खटला लढवण्याचे अधिकार मिळतील. पण आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य करायचा की नाही हा निर्णय पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य न केल्यास जगभरात पाकिस्तान स्वतःहून घेरलं जाईल. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आता पुढच्या काळात उपयोगी येणार आहेत.

आता मोदींचं काम सुरु

भारतात यापूर्वीही आणि यावेळीही स्थिर सरकार आल्यामुळे योग्य वकिलाची नेमणूक करुन खटला चालवण्यात कोणताही अडथळा आला नाही. हरिश साळवे यांनी प्रभावीपणे बाजू मांडून भारताला कौन्सिलर एक्सेस मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केलाय. पण पाकिस्तान या निर्णयावर काय भूमिका घेतं ते महत्त्वाचं आहे. पाकिस्तानने या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास भारताला आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दबाव वाढवता येईल.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती पाहता कोणताही धोका पत्करणं किंवा जगाच्या विरोधात जाणं परवडणारं नाही. पाकिस्तानने निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास भारताकडे यूएनएससी म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. या परिषदेत आयसीजेच्या निर्णयाचा सन्मान करत पाकिस्तानवर दबाव वाढवला जाऊ शकतो. यूएनएससीमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्सचा समावेश आहे. या परिषदेतील पाचही देशांसोबत भारताचे सध्याचे संबंध अत्यंत चांगले आहेत. याचा फायदा या खटल्यात होईल आणि निष्पक्ष पद्धतीने पुन्हा एकदा खटला चालवता येईल.

फाशीला स्थगिती

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा नकार दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे 18 मे 2017 रोजी कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.