AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात CAA कधी लागू होणार? बंगालमध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचं मोठं विधान

पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठं विधान केलं आहे.

देशात CAA कधी लागू होणार? बंगालमध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचं मोठं विधान
| Updated on: Dec 06, 2020 | 4:27 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठं विधान केलं आहे. मोदी सरकार पुढील वर्षीच्या सुरुवातीपासून बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्यास सुरुवात करु शकतं, असं मत कैलाश विजयवर्गीय यांनी व्यक्त केलं होतं. याआधी विजयवर्गीय यांनी सीएए बंगालमध्ये नक्कीच लागू केला जाईल, असंही म्हटलं होतं (Kailash Vijayvargiya says CAA likely to be implemented from january 2021).

कैलाश विजयवर्गीय म्हणाले, “नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार (Citizenship Amendment Act) निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्याचं काम पुढील वर्षी जानेवारीपासून सुरु होऊ शकतं. सरकारने स्वच्छ मनाने निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला होता.” ते पश्चिम बंगालमधील ‘और अन्याय नहीं’ या भाजपच्या कॅम्पेनमध्ये बोलत होते.

आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मागील महिन्यात म्हटलं होतं, “बिहार निवडणुकीतील विजयानंतर आता भाजपचं लक्ष्य पश्चिम बंगालवर आहे. बंगालची विधानसभा निवडणूक एप्रिल-मे 2021 मध्ये होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केलाय.

तृणमूल काँग्रेसने मात्र भाजपच्या पश्चिम बंगालमधील 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय म्हणाले होते, “पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्याचा भाजपचा दावा म्हणजे त्यांचा काल्पनिक आनंद आहे. या निवडणुकीत बहुतांश जागांवर भाजपच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल.”

संबंधित बातम्या :

आमच्या पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही जागा वाढतील : अमित शाह

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात…

प. बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंवर हल्ला, विद्यार्थ्यांकडून धक्काबुक्की

Kailash Vijayvargiya says CAA likely to be implemented from january 2021

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.