AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्थिरस्थावर होत असलेल्या कोल्हापूरकरांना पुन्हा धाकधूक, पंचगंगेची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली

पंचगंगा नदीचे पाणी 22 फुटांवरुन वाहत आहे.  जिल्ह्यातील 12 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप आहे. मात्र धरणक्षेत्रात संततधार सुरूच आहे.

स्थिरस्थावर होत असलेल्या कोल्हापूरकरांना पुन्हा धाकधूक, पंचगंगेची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली
| Updated on: Sep 04, 2019 | 10:43 AM
Share

Kolhapur Rain कोल्हापूर : राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसंडी मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर धो धो पाऊस कोसळत आहे. पुरात बुडालेलं कोल्हापूर (Kolhapur Rain ) हळूहळू स्थिरस्थावर होत असताना, पुन्हा पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात तब्बल 3 फुटांची वाढ झाली आहे.

पंचगंगा नदीचे पाणी 22 फुटांवरुन वाहत आहे.  जिल्ह्यातील 12 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप आहे. मात्र धरणक्षेत्रात संततधार सुरूच आहे.

पंचगंगेची धोक्याची पातळी 43 फुटांवर आहे. मात्र गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने पाणीपातळी 55 फुटांपेक्षा अधिक पातळीवरुन वाहात होती.

गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः  कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणार्‍या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. धरणांतून प्रतिसेकंद 2828 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुन्हा भोगावती नदीची पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोल्हापूर-सांगली महापूर

गेल्या महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुके जवळपास दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस पाण्याखाली होती. दोन्ही जिल्ह्यातील लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. शेकडो माणसं आणि हजारो जनावरांचा मृत्यू झाला. महापुरामुळे पुणे-बंगळुरु महामार्ग बंद झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवत होता.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.