AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती, भूस्खलनाच्या घटनेत वाढ

राज्यातील अतिवृष्टीचा फटका कोल्हापूर सांगलीसह कोकणालाही बसला आहे. या पूरपरिस्थितीनंतर आता सिंधुदुर्गमध्ये नवं संकट उभं ठाकलं आहे.

कोकणात माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती, भूस्खलनाच्या घटनेत वाढ
| Updated on: Aug 11, 2019 | 2:33 PM
Share

सिंधुदुर्ग : राज्यातील अतिवृष्टीचा फटका कोल्हापूर सांगलीसह कोकणालाही बसला आहे. या पूरपरिस्थितीनंतर आता सिंधुदुर्गमध्ये नवं संकट उभं ठाकलं आहे. गेल्या चार दिवसात दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीमध्ये रस्ता खचणे किंवा डोंगर कोसळले यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे कोकणात भूस्खलनाची भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर सांगली बरोबर सध्या कोकण ही पूरपरिस्थितीशी सामना करत आहे. कोकणातील पूर आटोक्यात आला असला तरी तळ कोकणात आता नवं संकट उभं राहिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. त्याशिवाय गेल्या दोन दिवसात कणकवली मध्ये तिवरे कुडाळ या ठिकाणच्या सरंबळ, आकेरी सावंतवाडीत आंबोली तर दोडामार्ग मध्ये झोळंबे गावामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत.

तसेच दोडामार्गातील काही भागात सध्या खाण प्रकल्प सुरु आहेत. डोंगर पोखरून त्यातील खनिज उत्खनन सुरू असल्यामुळे पावसामध्ये त्या ठिकाणच्या गावांना चिखलाचा सामना सहन करावा लागतो. काही ठिकाणी तर रस्ते पूर्ण पणे उचकटले आहेत. रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे डोंगरात पाणी साठा वाढल्याने हे डोंगर खचत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र रस्त्यांना भेगा पडण्याचे प्रमाण अचानक का वाढले आहे अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान प्रशासनाने या संदर्भात तपासणीकरिता भूभर्ग शास्त्रज्ञांना पाठवलं आहे

भूस्खलनामुळे लोक धास्तावले असून शासनाने तातडीने याची दखल घेऊन धोक्याच्या छायेतील लोकांना स्थलातरीत करण्याची गरज आहे. अन्यथा कोकणात माळीणची पुनरावृत्ती होऊ शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...