मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लतादीदींची साद; दीपावली पर्वावर म्हणाल्या…
दीपावली पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेल्या आवाहनाला ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रतिसाद दिला आहे. लतादिदींनी ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना तसेच राज्यातील जनतेला दिवाळीनिमित्त फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : दीपावली पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहनाला गान सम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रतिसाद दिला आहे. लतादिदींनी ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना तसेच राज्यातील जनतेला दिवाळीनिमित्त फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच फटाके फोडण्याऐवजी दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा, असं लतादिदी म्हणाल्या आहेत. (Lata Mangeshkar responded to Uddhav Thackeray appealed to use less firecrackers)
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. दीपावली पर्वावर सर्वांनी फटाके कमी फोडावेत. आपण प्रदूषण रोखायला हवे. आपण सर्व प्रकाशपर्व साजरे करु. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी मास्क वापरावा. प्रत्येकाने आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.” असे लता मंगेशकर म्हणाल्या.
महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे जी ने आज टेलीविज़न पे जो कहा उसपर सबने अमल करना बहुत ज़रूरी है ऐसा मुझे लगता हैं. दिवाली में पटाखे कम से कम जलाए, प्रदूषण को रोकें ,प्रकाश का पर्व मनाएँ, दीपोत्सव मनाएं.मास्क अवश्य लगाएँ.अपना,अपने परिवार का और समाज का ख़याल रखें. pic.twitter.com/9PB4E2jG1p
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) November 8, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी आज (8 नोव्हेंबर) संवाद साधला यावेळी “दिवाळी आली आहे, गर्दी वाढत चालली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. अशावेळी खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी जिद्द, आत्मविश्वास, शिस्तीने कोरोनाची लाट आटोक्यात आणली. पण आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, रोषणाई करा. आजूबाजूला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन प्रदूषण होणार नाही असे फटाके फोडा. पोलीस, महसूल, आरोग्य सेवक, डॉक्टर अत्यंत तणावाखाली जनतेसाठी लढत आहेत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आता आपल्याजवळ मास्कशिवाय दुसरं शस्त्र नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, लॉकडाऊननंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात अनेक गोष्टी पूर्णपणे सुरु करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी ही 50 टक्के क्षमतेवर सुरु आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे दिसत आहे. मात्र सर्वांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; टीकेची पर्वा न करता कामं करणारच; मुख्यमंत्र्यांचा निर्धार
(Lata Mangeshkar responded to Uddhav Thackeray appealed to use less firecrackers)