AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसाममध्ये पुराचं थैमान सुरुच, 128 जणांचा मृत्यू, 26 लाखापेक्षा अधिक लोकांना फटका

आतापर्यंत आसाममध्ये 23 जिल्ह्यांमधील 26 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर 128 जणांचा मृत्यू झालाय. (Latest Updates of Assam Flood).

आसाममध्ये पुराचं थैमान सुरुच, 128 जणांचा मृत्यू, 26 लाखापेक्षा अधिक लोकांना फटका
| Updated on: Jul 27, 2020 | 8:01 AM
Share

दिसपूर : आसाममधील पूरस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे (Assam floods). आतापर्यंत आसाममध्ये 23 जिल्ह्यांमधील 26 लाख लोकांना याचा फटका बसला आहे (Latest Updates of Assam Flood). लाखो लोकांना पुरामुळे विस्थापित करुन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. राज्यात रविवारी आणखी 5 नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला. आसामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाम राज्य आपत्ती निवारण विभागाने (ASDMA) दिलेल्या पूरस्थितीच्या माहितीवरुन बारपेटा आणि कोकराझार जिल्ह्यांमध्ये रविवारी प्रत्येकी दोन नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय मोरीगाव जिल्ह्यात देखील एकाचा मृत्यू झाला. आसाममध्ये पूर आणि इतर पुराशी संबंधित कारणांमुळे 102 तर भूस्खलनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आसाममध्ये आतापर्यंत 24.76 लाखपेक्षा अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका गोलपाडा भागाला बसला आहे. येथे जवळपास 4.7 लाखांपेक्षा अधिक लोकांना विस्थापित करावं लागलं. राज्यात 101 बचाव होड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मागील 24 तासात जिल्हा प्रशासनाने आणि स्थानिक लोकांनी 188 जणांना वाचवले आहे. शनिवारपर्यंत (25 जुलै) 27 जिल्ह्यांमधील 26.37 लाखांपेक्षा अधिक जणांना पुराचा फटका बसला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, आसाममधील पुरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु आहे. देशभरातून पुरग्रस्तांविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी देखील आसामधील पुराची स्थिती जाणून घेतली आहे.

हेही वाचा :

कोरोना संपवण्यासाठी राम मंदिर भूमिपूजनापर्यंत रोज हनुमान चालिसा म्हणा : प्रज्ञासिंह ठाकूर

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन दहा दिवसांवर, नागपुरातून पवित्र माती आणि पाणी रवाना

‘भाभीजी पापड’ खा आणि कोरोनामुक्त व्हा, केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दावा

Latest Updates of Assam Floods

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.