AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा कारगिल झाल्यास ते शेवटचं युद्ध असेल : वायूसेना प्रमुख धानोआ

सर्व चांगल्या जनरल्सप्रमाणे आम्ही अखेरचं युद्ध लढण्यास तयार आहोत, असं म्हणत बीएस धानोआ यांनी पाकिस्तानला इशारा दिला. शेजारी पाकिस्तानने काही हालचाल केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे त्यांनी स्पष्ट केलं.

पुन्हा कारगिल झाल्यास ते शेवटचं युद्ध असेल : वायूसेना प्रमुख धानोआ
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 16, 2019 | 6:25 PM
Share

नवी दिल्ली : कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोलताना वायूसेना प्रमुख बीएस धानोआ यांनी पाकिस्तानला धमकीवजा इशारा दिलाय. पुन्हा कारगिलसारखं युद्ध झाल्यास आपण कधीही तयार आहोत, असं ते म्हणाले. सर्व चांगल्या जनरल्सप्रमाणे आम्ही अखेरचं युद्ध लढण्यास तयार आहोत, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. शेजारी पाकिस्तानने काही हालचाल केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे त्यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तानने पाच महिने आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना प्रवेश बंदी केली होती. ही बंदी पाकिस्तानने स्वतःहून मागे घेतल्यानंतर काही तासातच बीएस धानोआ यांचा हा सूचक इशारा आलाय. गरज पडल्यास आपण कोणत्याही वातावरण, मग ढगाळ वातावरण असताना आकाशातूनही आपण बॉम्ब टाकू शकतो. 26 फेब्रुवारीला (बालाकोट एअर स्ट्राईक) आपण असाच एक हल्ला पाहिलाय, जो आपली ताकद लांबूनच मारा करण्याची क्षमता सिद्ध करतो, असं ते म्हणाले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आलं होतं. यानंतर भारताने बदला घेत पाकिस्तानमध्ये असलेल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. वायूसेनेच्या विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर बॉम्बचा मारा केला होता, ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचाही दावा करण्यात आला. सीमेवरील तणाव पाहता पाकिस्तानने 27 फेब्रुवारीपासून हवाई क्षेत्र बंद केलं होतं. बिथरलेल्या पाकिस्तानने काही दिवसांसाठी स्वतःच्याच विमानांचं उड्डाण रोखलं होतं.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली